शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

विचारांची देवाणघेवाण होणे हा जयंती साजरा करण्याचा मुख्य हेतू : प्रा. विजय गरजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:15 IST

नीरा : क्रांतिकारकांची जयंती साजरी करणे हे निमित्त आहे. खरे तर समाज एकत्र करून विचारांची देवाणघेवाण होणे हा जयंती ...

नीरा : क्रांतिकारकांची जयंती साजरी करणे हे निमित्त आहे. खरे तर समाज एकत्र करून विचारांची देवाणघेवाण होणे हा जयंती साजर करण्याचा मुख्य हेतू आहे. क्रांतिकारकांना समाजा समाजात विभागू नये, ते अखंड हिंदुस्थानासाठी लढले व बलिदान दिले. त्यामुळे जयंती साजरी करताना सर्व समाजातील लोकांनी एकत्रित येऊन क्रांतिकारांची जयंती साजरी करणे हीच त्यांच्या बलिदानाला खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन प्रा. विजय गरजारे यांनी नीरा येथे केले.

नीरा (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची २३० वी जयंतीनिमित्त प्रा. गरजारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. मंगळवारी नीरा ग्रामपंचायतीच्या इमारतीत व छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिमा पूजन व पुष्प अर्पण करून घोषणा देत जयंती साजरी करण्यात आली.

या वेळी उपसरपंच राजेश काकडे, माजी जि. प. सदस्य विराज काकडे, पुरंदर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षा कोमल निगडे, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भय्यासाहेब खाटपे, जय मल्हार संघटनेच्या राज्य महिला अध्यक्ष सुजाता जाधव, जय मल्हार क्रांती संघटनेचे शहर अध्यक्ष सुनील जाधव, बौद्ध महासभेचे अध्यक्ष दादा गायकवाड, प्रहारचे मंगेश ढमाळ, ग्रामपंचायतीचे सदस्य राधा माने, वैशाली काळे, प्रमोद काकडे, अनिल चव्हाण, अभिषेक भालेराव, अनंता चव्हाण, संदीप धायगुडे, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

सूत्रसंचलन अशोक जाधव, प्रास्ताविक सुनील पाटोळे यांनी केले, तर आभार दादा गायकवाड यांनी आभार मानले.

--

फोटो : ०७ नीरा उमाजी नाईक

फोटोओळ : नीरा (ता.पुरंदर) ग्रामपंचायतीचे सभागृहात आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त व्याखानात मार्गदर्शन करताना प्रा.विजय गरजारे व समोर ग्रामस्थ.