शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

थंडीअभावी साखर उतारा घटला

By admin | Updated: November 15, 2015 00:50 IST

ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांच्या संपानंतर आता जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी जोमाने धडधडू लागली आहेत.

सोमेश्वरनगर : ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांच्या संपानंतर आता जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी जोमाने धडधडू लागली आहेत. जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी मिळून ६ लाख ५९ हजार ३०१ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. ६ लाख ४ हजार १५५ पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. मात्र, थंडीचे प्रमाण पुरेसे नसल्याने साखर उतारा अजून नऊ टक्क्यांवरच घुटमळत आहे. भीमा पाटस कारखाना दोन दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. राजगड कारखान्याचे धुराडे अजून बंदच आहे. या वर्षी साखर कारखान्यांचे हंगाम सुरू होण्याआधीच कारखान्यांपुढे अनेक विघ्ने उभी होती. ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे कारखाने सुरू होण्यासाठी १० नोव्हेंबर उजाडला. या वर्षी उसाचे जादा क्षेत्र व दुष्काळाची भीषणता या पार्श्वभूमीवर ऊस गाळप लवकर संपविणे साखर कारखान्यांपुढे एक आव्हान आहे. १५ कारखान्यांपैकी भीमा पाटस व राजगड कारखाने वगळता उर्वरित १३ कारखान्यांमध्ये गाळपाच्या व साखर उत्पादनाच्याबाबतीत सहकारी साखर कारखान्यांच्या पुढे खासगी कारखाने गेले आहेत. बारामती अ‍ॅग्रो कारखाना ९८ हजार ४९० टन उसाचे गाळप करून १ लाख १ हजार ९५० पोत्यांचे उत्पादन घेत पहिल्या स्थानावर आहे. ८८ हजार टन उसाचे गाळप करून ८६ हजार पोत्यांचे उत्पादन घेत दौंड शुगर दुसऱ्या स्थानावर आहे. ७२ हजार ९६० टन उसाचे गाळप करून ६२ हजार ७०० पोत्यांचे उत्पादन घेत विघ्नहर तिसऱ्या स्थानावर आहे. ऊस गाळपाबरोबरच साखर उताऱ्यामध्ये खाजगी कारखान्यांनी बाजी मारली आहे. त्यात बारामती अ‍ॅग्रो पहिल्या क्रमांकावर आहे. (प्रतिनिधी)