शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

उड्डाणपुलातून जनतेच्या पैशांची लूट

By admin | Updated: June 2, 2016 00:33 IST

उड्डाणपूल हे विकासाचे सेतू मानले जात असले, तरी उड्डाणपुलांच्या कामात ठेकेदारांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने जनतेच्या पैशांची लूट होत आहे

पिंपरी : उड्डाणपूल हे विकासाचे सेतू मानले जात असले, तरी उड्डाणपुलांच्या कामात ठेकेदारांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने जनतेच्या पैशांची लूट होत आहे. काही पुलांचा दुपटीने नव्हे, तर दहा पटींनी खर्च वाढविला आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका शहरवासीयांच्या तिजोरीला बसला आहे. मूळ किमतीपेक्षा दहा पटींनी वाढ देऊन पालिकेने ठेकेदारांचे खिसे भरले आहेत. पिंपरीतील एम्पायर इस्टेट, चिंचवड येथील केएसबी चौक, कुदळवाडी चौकाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यावर कोणीही लोक प्रतिनिधी भाष्य करीत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.पिंपरी-चिंचवड शहराचा विकास वेगाने झाला, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. मात्र, एकमुखी सत्तेच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक प्रकल्प रेटून नेले आहेत. रस्ते, उड्डाणपूल अशी विकासकामे मोठ्या प्रमाणावर झाले असले, तरी नियोजनाचा अभाव आणि विकासकामांवर पदाधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने उड्डाणपुलांचा खर्च कोट्यवधींच्या पटीत वाढला आहे. ठेकेदार, पदाधिकारी आणि अधिकारी अशी रिंग असल्याने बोलायचे कोणी असा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्यांचाही आवाज क्षीण असल्याने वाढीव खर्चावर कोणाचेही निर्बंध नसल्याचे दिसून येतात. काळेवाडी देहू-आळंदी बीआरटी मार्गावर केएसएसबी चौकात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. जे कुमार यांनी हा पूल १.२ किलोमीटर उभारण्यास सुरुवात केली आहे. त्याचा मूळ खर्च ११० कोटी आहे. मार्च २०१४ पासून या पुलाचे काम सुरू झाले असून, अडीच वर्षांची मुदत ठेकेदाराला दिली आहे. सहा महिने शिल्लक राहिले असले, तरी काम संथगतीने सुरू असल्याचे दिसून येते. या कामासाठी सुमारे ५० कोटी रुपये ठेकेदाराला अदा केलेले आहेत. काम रखडल्याने या चौकातील वाहतूककोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. कुदळवाडीत टाटा कंपनीच्या सीमेवर प्राधिकरणाच्या वतीने उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू केले. हे काम मातेरे कंपनी करीत आहे. या कामाची मुदत संपूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीला खुला केलेला नाही. तसेच या उड्डाणपुलासाठीचा राडारोडाही पडून आहे. (प्रतिनिधी)पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एम्पायर इस्टेट, चिंचवड येथे पवना नदी काळेवाडी ते पिंपरीत आॅटो क्लस्टर असा १.६ किलोमीटरचा रस्ता तयार करण्याचे काम आॅक्टोबर २०११ मध्ये सुरू झाले. त्या वेळी त्याचा खर्च होता ९९ कोटी. गॅमन इंडियाला हे काम देण्यात आले होते. त्या कामाची सप्टेंबर २०१५ ही शेवटीची मुदत मात्र, काम पूर्ण न झाल्याने जून २०१६ ही मुदत दिली होती. मात्र, अजूनही काम पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत ६०.९० कोटी ठेकेदाराला अदा केलेले आहेत. वाढीव दर मिळावा, अशी मागणी ठेकेदाराने केली आहे. गॅमन इंडियाच्या वतीने पुलाचे काम संथगतीने केले जात आहे. याबाबत सर्वसाधारण सभेतही प्रश्न उपस्थित झाला होता. अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणीही केली होती. पुढे काहीही झालेले नाही. पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी या विषयावर तोंडावर बोट ठेवले आहे.सल्लागारांवरकारवाईची मागणी रस्ते, उड्डाणपुलाच्या कामांसाठी महापालिकेने सल्लागार नेमलेले आहेत. मात्र, हे सल्लागार केवळ प्रकल्पांची टक्केवारी घेण्यापलीकडे काहीही करीत नाहीत. सल्लागारांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. सल्लागार असतानाही वाढीव खर्च होतो कसा, सल्लागारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.