शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

लोकमत उडाण करिअर मार्गदर्शन व्याख्यान उद्या

By admin | Updated: April 26, 2015 01:24 IST

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय? हा मोठा प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या समोर उभा राहतो.

पुणे : बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय? हा मोठा प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या समोर उभा राहतो. परंतु, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, नर्सिंग या नेहमीच्या अभ्यासक्रमांशिवाय आणखी कोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन आपले करिअर उज्ज्वल करता येऊ शकते याबाबतचे योग्य मार्गदर्शन येत्या २७ एप्रिल रोजी ‘लोकमत उडाण करिअर मार्गदर्शन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना दिले जाणार आहे.लोकमत आणि मुंबई येथील नर्सी मोन्जी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता कोथरूड येथील मयूर कॉलनी परिसरातील बालशिक्षण मंदिरच्या एमईएस सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केवळ ग्रामीण भागातीलच नाही, तर शहरी भागातील विद्यार्थी व पालकांचा सुद्धा करिअर निवडताना गोंधळ उडतो. त्यामुळे बारावीमध्ये प्रवेश घेतलेल्या व बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, सी.ए., पायलट, मेडिकल, फायनान्स, टुरिझम त्याचबरोबर नव्याने सुरू झालेल्या सॉफ्ट स्किल अभ्यासक्रमांविषयी व उद्योग क्षेत्रात निर्माण होणाऱ्या विविध रोजगारांविषयावर मुंबईचे प्रा. मनोज अनोकर, प्रा. योगेश कुलकर्णी आणि कॅप्टन अभिषेक मदिराला या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमता ओळखून योग्य करिअरची निवड करणे आवश्यक असते. बारावीनंतर विद्यार्थ्याच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते. त्यामुळे बारावीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याने योग्य करिअरची निवड करणे गरजेचे असते. त्यामुळेच ‘लोकमत’ने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. करिअर निवडण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, अशा पालक व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मिळणार आहेत. त्यामुळे पुणे शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी या संधीचा अधिकाधिक फायदा घ्यावा. हा कार्यक्रम विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य असून, अधिक माहितीसाठी ९९२१२७४७४७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)बारावीची परीक्षा दिली, पुढे काय ?४इंजिनिअरिंग, मेडिकल की आयआयटी, कुठे प्रवेश घ्यावा, या प्रश्नांची योग्य उत्तरे जाणून घेण्याची संधी.४हुशार, सर्वसाधारण अशा सर्व विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन.