शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य महामंडळाची तारेवरची कसरत

By admin | Updated: November 10, 2015 01:38 IST

साहित्य संमेलनांना आलेले उत्सवी स्वरूप, साहित्यिकांपेक्षा राजकारणी व्यक्ती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची व्यासपीठावरील गर्दी हे चित्र अनेक वेळा पाहायला मिळते

पुणे : साहित्य संमेलनांना आलेले उत्सवी स्वरूप, साहित्यिकांपेक्षा राजकारणी व्यक्ती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची व्यासपीठावरील गर्दी हे चित्र अनेक वेळा पाहायला मिळते. संमेलन पार पाडण्यासाठी हितसंबंध जोपासण्याची वेळ आयोजकांवर येते. ८९व्या संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांनी सत्कार समारंभातच ‘अध्यक्षपदाचा अवमान खपवून घेणार नाही’, असा सज्जड दम दिल्याने साहित्य महामंडळाला तारेवरची कसरत करावी लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत.साहित्य संमेलनांना उत्सवी स्वरूप आल्याचे साहित्य परिषदेनेही मान्य केले आहे. साहित्याचा उत्सव साजरा करण्यात काही हरकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर, दुसरीकडे व्यासपीठावर राजकारणी व्यक्तींची होणारी गर्दी हासुद्धा दर वर्षी वादाचा विषय असतो. साहित्याच्या व्यासपीठावर राजकारणी व्यक्ती कशासाठी, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतो. राजकारण्यांच्या भाऊगर्दीमुळे व्यासपीठावरून साहित्यिक दूर सारले जातात, हे नेहमीचेच चित्र असते. पण, भविष्यात हे चित्र बदलेल, अशी आशा करायला काही हरकत नाही. पिंपरी येथे होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य श्रीपाल सबनीस निवडून आले आहेत. या निमित्त प्रथेप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिदषेने त्यांचा सत्कार केला. या सत्कार सोहळ्यात सबनीस यांनी कळीच्या मुद्द्यालाच हात घातला. संमेलनादरम्यान साहित्य संमेलनाध्यक्षांचा अवमान खपवून घेणार नाही, संमेलनाध्यक्षांचा अवमान म्हणजे महाराष्ट्रातील अकरा कोटी जनतेचा अवमान, अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे घेतली आहे.या संदर्भात सबनीस यांनी काही संदर्भ दिले आहेत. ते म्हणाले, ‘‘घुमानच्या संमेलनात उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्षांना अंग चोरून उभे राहण्याची वेळ आली. ते बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांची खुर्ची इतरांनी बळकावली. संमेलनाचे अध्यक्षपद हे मानाचे आहे. अध्यक्षांचा मान राखलाच गेला पाहिजे. ही बाब कुणाच्या लक्षात आली की नाही हे माहीत नाही, पण एक जागरुक नागरिक म्हणून मी हा मुद्दा उपस्थित केला.’’सबनीस म्हणाले, ‘‘राजकारणी व्यक्तींनी व्यासपीठावर असू नये, असे मी म्हणत नाही. यशवंतरावांची परंपरा जपणाऱ्या राजकारणी व्यक्तींचे स्वागतच करू. संमेलनाध्यक्षांचा सन्मान राखणे ही महामंडळाचीच जबाबदारी आहे. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून परिषदेच्या घरगुती कार्यक्रमात व्यथा बोलून दाखविली.’’ (प्रतिनिधी)