शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य-कला म्हणजे राजकारण्यांना एकत्र आणणारा ‘माळकरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:09 IST

पुणे : “युरोप आणि अमेरिकेसारखे श्रीमंत देश राजकीय पक्ष संख्येच्या बाबतीत दरिद्री आहेत. पण आपल्या देशात असंख्य पक्ष आहेत. ...

पुणे : “युरोप आणि अमेरिकेसारखे श्रीमंत देश राजकीय पक्ष संख्येच्या बाबतीत दरिद्री आहेत. पण आपल्या देशात असंख्य पक्ष आहेत. या सर्वांना एकत्र आणणारा ‘माळकरी’ म्हणजेच साहित्य आणि कला होय,” असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विसाव्या साहित्यिक कलावंत संमेलनात ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखिका डॉ अरुणा ढेरे यांना आणि अभिनेते मोहन जोशी यांना ‘वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव’ पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, गरवारे फायबर लिमिटेडचे संचालक श्रीधर राजपाठक, मकरंद पाचडे, अनिल देहडीराय, प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे आदी उपस्थित होते.

डॉ. आगाशे म्हणाले की, एका पातळीवर आपण सर्व एकत्र असल्याची व्यवस्था निसर्गाने केली आहे. कला, साहित्य लोकांना एकत्र आणते. परंतु व्यवसाय, राजकारण हे वेगळे करते. कोव्हिडमुळे आपली कल्पनाशक्ती वाढली आहे. मानवाला ‘व्हर्च्युअल’ जगायला आवडत आहे. तो मोबाईलमध्येच एकमेकांना भेटतोय. मात्र सर्वांगीण शारीरिक विकासासाठी, जीवन सुंदर होण्यासाठी कला, साहित्याचा वापर केला पाहिजे.

चौकट

“सर्व क्षेत्रात कष्टाशिवाय यश मिळत नाही. साहित्य, कला क्षेत्रही त्याला अपवाद नाही. स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्याबरोबरच ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. कलावंत हा नेहमी भुकेलेला असतो. आपले नेहमी कौतुक व्हावे अशी त्याची इच्छा असते. कष्टाशिवाय ते होत नाही,” असे मनोगत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केले. समाजातील दुर्बल घटकांचे आपण देणे लागत असल्याने मी देहदान करण्याचे ठरवले आहे. प्रत्येकाने देहदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

चौकट

“साहित्यात शब्दाला महत्व दिले जाते. लिखित शब्दाला ध्वनीची जोड मिळाली की तो जिवंत होतो. आपल्या मौखिक परंपरेने लिखित शब्दाला जागे केले आहे. त्यात स्त्रियांचा मोठा वाटा आहे. साहित्य परंपरेने एकीकडे सामाजिक बांधिलकी होत आहे. पण आपण अजूनही शक्तीवंत समाज म्हणून उभे राहिलो नाहीत. सर्वच क्षेत्रातील फुटीरता-राजकारण याला बळी पडत आहोत. स्वतःला सुशिक्षित समजतो. परंतु समूहशक्तीचा विसर पडला असल्याचा पुनर्वविचार करायला पाहिजे,” असे डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या.