शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
2
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
3
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
4
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
5
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
6
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
7
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
8
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
9
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
10
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
11
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
12
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
13
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
14
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
15
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
16
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
17
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
18
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
19
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
20
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 

साहित्य-कला म्हणजे राजकारण्यांना एकत्र आणणारा ‘माळकरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:09 IST

पुणे : “युरोप आणि अमेरिकेसारखे श्रीमंत देश राजकीय पक्ष संख्येच्या बाबतीत दरिद्री आहेत. पण आपल्या देशात असंख्य पक्ष आहेत. ...

पुणे : “युरोप आणि अमेरिकेसारखे श्रीमंत देश राजकीय पक्ष संख्येच्या बाबतीत दरिद्री आहेत. पण आपल्या देशात असंख्य पक्ष आहेत. या सर्वांना एकत्र आणणारा ‘माळकरी’ म्हणजेच साहित्य आणि कला होय,” असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विसाव्या साहित्यिक कलावंत संमेलनात ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखिका डॉ अरुणा ढेरे यांना आणि अभिनेते मोहन जोशी यांना ‘वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव’ पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, गरवारे फायबर लिमिटेडचे संचालक श्रीधर राजपाठक, मकरंद पाचडे, अनिल देहडीराय, प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे आदी उपस्थित होते.

डॉ. आगाशे म्हणाले की, एका पातळीवर आपण सर्व एकत्र असल्याची व्यवस्था निसर्गाने केली आहे. कला, साहित्य लोकांना एकत्र आणते. परंतु व्यवसाय, राजकारण हे वेगळे करते. कोव्हिडमुळे आपली कल्पनाशक्ती वाढली आहे. मानवाला ‘व्हर्च्युअल’ जगायला आवडत आहे. तो मोबाईलमध्येच एकमेकांना भेटतोय. मात्र सर्वांगीण शारीरिक विकासासाठी, जीवन सुंदर होण्यासाठी कला, साहित्याचा वापर केला पाहिजे.

चौकट

“सर्व क्षेत्रात कष्टाशिवाय यश मिळत नाही. साहित्य, कला क्षेत्रही त्याला अपवाद नाही. स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्याबरोबरच ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. कलावंत हा नेहमी भुकेलेला असतो. आपले नेहमी कौतुक व्हावे अशी त्याची इच्छा असते. कष्टाशिवाय ते होत नाही,” असे मनोगत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केले. समाजातील दुर्बल घटकांचे आपण देणे लागत असल्याने मी देहदान करण्याचे ठरवले आहे. प्रत्येकाने देहदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

चौकट

“साहित्यात शब्दाला महत्व दिले जाते. लिखित शब्दाला ध्वनीची जोड मिळाली की तो जिवंत होतो. आपल्या मौखिक परंपरेने लिखित शब्दाला जागे केले आहे. त्यात स्त्रियांचा मोठा वाटा आहे. साहित्य परंपरेने एकीकडे सामाजिक बांधिलकी होत आहे. पण आपण अजूनही शक्तीवंत समाज म्हणून उभे राहिलो नाहीत. सर्वच क्षेत्रातील फुटीरता-राजकारण याला बळी पडत आहोत. स्वतःला सुशिक्षित समजतो. परंतु समूहशक्तीचा विसर पडला असल्याचा पुनर्वविचार करायला पाहिजे,” असे डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या.