शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सरपंचाच्या सह्यांच्या अधिकारावर मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नारायणगाव : जिल्हा परिषदेकडील विकास कामे व विकास योजनेची अंमलबजावणी करताना सरपंच यांचे सह्यांचे अधिकार काढून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नारायणगाव : जिल्हा परिषदेकडील विकास कामे व विकास योजनेची अंमलबजावणी करताना सरपंच यांचे सह्यांचे अधिकार काढून यापुढे गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने सह्या करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. या निर्णयाचे तीव्र पडसाद जुन्नर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात उमटले आहे. या निर्णयाचा सरपंचांनी निषेध केला आहे. हा निर्णय तत्काळ रद्द न केल्यास तालुक्यातील सर्व सरपंच तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढलेल्या आदेशावर जुन्नरचे गट विकास अधिकारी एस. वाय. माळी यांनी ५ मे रोजी अति तात्काळ आदेश काढून जिल्हा परिषदेतील विकास कामे व विकास योजने यांचे अंमलबजवणी करताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्हा परिषद विकास योजना या नावे गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे संयुक्त बचत खाते तत्काळ काढण्यात यावे. १२ मे २०२१ पर्यंत बचत खाते काढल्याची माहिती पंचायत समितीकडे सादर करावी. काढण्यात आलेल्या बचत खात्याद्वारे सन २०२०-२१ मध्ये प्राप्त झालेल्या विकासकामांचे अनुदान जमा करून तात्काळ कार्यवाही करावी असे आदेशात गटविकास अधिकारी माळी यांनी म्हटले आहे. तसेच जिल्हा परिषदेकडील विकास कामे व विकास योजनेची अंमलबजावणी करताना सरपंचांनी गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने सह्या करण्याचे आदेश दिले आहे.

या निर्णयाच्या विरोधात तालुक्यातील ३५ सरपंचांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी बैठक घेत निर्णयाचा निषेध केला. सरपंच विक्रम भोर, योगेश पाटे, महेश शेळके, प्रदीप थोरवे, राजेंद्र मेहेर, महेश शेळके, वैशाली जाधव, तारामती कडलक तसेच उपस्थित सर्व सरपंचांनी हा आदेश सरपंचांच्या अधिकारावर गदा आणणार आहे. या निर्णयाला सर्व सरपंचांचा विरोध आहे, असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, सदस्य यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला. जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांना या बाबतचे निवेदन देत हा निर्णय मागे न घेतल्यास आंदाेलनाचा इशारा दिला. जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेता काढण्यात आलेला हा आदेश नियमबाह्य असून तो त्वरित मागे घ्यावा आणि नियमबाह्य आदेश काढणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी सह जुन्नरचे गटविकास अधिकारी एस. वाय. माळी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

कोट

जिल्हा परिषदेचा निधी योग्य प्रकारे खर्च व्हावा तसेच व्याजाची रक्कम जिल्हा परिषदेला मिळावी या साठी आम्ही ग्रामपंचायत स्तरावर विकासनिधीच्या नावाने खाते काढण्यात यावे अशा सुचना केल्या होत्या. विकास कामांची रक्कम त्या कामावरच खर्च व्हावी हा आमचा हेतू होता. सरपंचांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा कुठलाच हेतू नव्हता.

- निर्मला पानसरे , अध्यक्ष जिल्हा परिषद

कोट

हा आदेश काढण्यापूर्वी सर्वांना याची माहिती देण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या निधीचे योग्य वितरण व्हावे या साठी ग्रामपमचायतींना नवे खाते काढण्यास सांगण्यात आले होते. या निर्णयामुळे कुणाच्याही अधिकारांवर गदा येणार नाही. या नव्या खात्याचे मालकी हक्क हे ग्रामपंचायतीचे, सरपंचांचे आणि ग्रामसेवकांचेच राहणार आहे.

-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

कोट जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेता हा आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश तत्काळ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- आशा बुचके, जिल्हा परिषद सदस्य

फोटो : मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढलेल्या आदेशाचा निषेध करून तो आदेश रद्द करण्याचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांना सादर करताना जुन्नर तालुक्यातील सरपंच.