शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील भात शेतीला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डिंभे : भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील सुमारे ५७ हजार ९६१ हेक्टर भात क्षेत्रापैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डिंभे : भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील सुमारे ५७ हजार ९६१ हेक्टर भात क्षेत्रापैकी ५४ हजार १०१ हेक्टर क्षेत्र यंदा लागवडीखाली आले आहे. जिल्ह्यात सुमारे ९३ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळाशी या भागातील भात उत्पादक शेतकरी धास्तावले होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील भातशेतीला जीवदान मिळाले असून. शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांकडून दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती केली जाते. भातशेती हेच या भागातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. येथील भातक्षेत्र हे प्रामख्याने जिरायती क्षेत्र केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडू लागली आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळाशी, भोर, वेल्हा हे तालुके भातशेतीचे आगर समजले जातात. या भागात आंबेमोहोर, इंद्रायणी, जिर, तांबडा रायभोग, बासमती या पारंपरिक वाणाबरोबरच विविध संकरित वणानांचीही लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्रापैकी ९३ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे.

चौकट

तालुका एकूण क्षेत्र (हेक्टर) लागवड झालेले क्षेत्र (हेक्टर) टक्के

जुन्नर १०,८०० १०,८०० १००.००

आंबेगाव. ५१३७ ४८२१ ९३.८४

खेड ७७५० ६६१० ८५.२९

हवेली २९५४ २९५४ १००

मुळशी ७७०० ६४५५ ८३.८३

भोर ७१४३ ७४८० १०४.७१

मावळ ११,५५० १०,१२१ ८७.६३

वेल्हे ४९३४ ४७१७ ९५.००

पुरंदर १०१२ ११४१ ११२.७५

चौकट

मागील महिन्यापासून पावसाने घेतलेली मोठी विश्रांती भात उत्पादक शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवू लागली होती. जुलै महिन्यातील अतिवृष्टीतून उरल्यासुरल्या हळव्या व गरव्या जातीच्या भातवाढीसाठी पावसाची नितांत गरज असतानाच पावसाने काढता पाय घेतल्याने खाचरातील पाणी आटून पिके पिवळी पडू लागली होती. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली असून, या पावसाने भातपिकाला जीवदान दिले आहे. यामुळे भात उत्पादक शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

कोट

यंदा अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले. उरलीसुरली शेतीही पाण्याअभावी वाया जाण्याची भीती वाटत होती. पण पावसाने जिवात जीव आला आहे. कशीबशी हातातोंडाशी गाठ पडण्याची अपेक्षा आहे - चंद्रकांत भवारी, भात उत्पादक शेतकरी

फोटो : अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार सुरुवात केल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भातपिकाला जीवदान मिळाल्याने शेतकरीवर्ग पुन्हा कामाला लागला आहे. (छायाचित्र : कांताराम भवारी)