शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यातील भात शेतीला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डिंभे : भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील सुमारे ५७ हजार ९६१ हेक्टर भात क्षेत्रापैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डिंभे : भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील सुमारे ५७ हजार ९६१ हेक्टर भात क्षेत्रापैकी ५४ हजार १०१ हेक्टर क्षेत्र यंदा लागवडीखाली आले आहे. जिल्ह्यात सुमारे ९३ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळाशी या भागातील भात उत्पादक शेतकरी धास्तावले होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील भातशेतीला जीवदान मिळाले असून. शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांकडून दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती केली जाते. भातशेती हेच या भागातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. येथील भातक्षेत्र हे प्रामख्याने जिरायती क्षेत्र केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडू लागली आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळाशी, भोर, वेल्हा हे तालुके भातशेतीचे आगर समजले जातात. या भागात आंबेमोहोर, इंद्रायणी, जिर, तांबडा रायभोग, बासमती या पारंपरिक वाणाबरोबरच विविध संकरित वणानांचीही लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्रापैकी ९३ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे.

चौकट

तालुका एकूण क्षेत्र (हेक्टर) लागवड झालेले क्षेत्र (हेक्टर) टक्के

जुन्नर १०,८०० १०,८०० १००.००

आंबेगाव. ५१३७ ४८२१ ९३.८४

खेड ७७५० ६६१० ८५.२९

हवेली २९५४ २९५४ १००

मुळशी ७७०० ६४५५ ८३.८३

भोर ७१४३ ७४८० १०४.७१

मावळ ११,५५० १०,१२१ ८७.६३

वेल्हे ४९३४ ४७१७ ९५.००

पुरंदर १०१२ ११४१ ११२.७५

चौकट

मागील महिन्यापासून पावसाने घेतलेली मोठी विश्रांती भात उत्पादक शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवू लागली होती. जुलै महिन्यातील अतिवृष्टीतून उरल्यासुरल्या हळव्या व गरव्या जातीच्या भातवाढीसाठी पावसाची नितांत गरज असतानाच पावसाने काढता पाय घेतल्याने खाचरातील पाणी आटून पिके पिवळी पडू लागली होती. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली असून, या पावसाने भातपिकाला जीवदान दिले आहे. यामुळे भात उत्पादक शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

कोट

यंदा अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले. उरलीसुरली शेतीही पाण्याअभावी वाया जाण्याची भीती वाटत होती. पण पावसाने जिवात जीव आला आहे. कशीबशी हातातोंडाशी गाठ पडण्याची अपेक्षा आहे - चंद्रकांत भवारी, भात उत्पादक शेतकरी

फोटो : अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार सुरुवात केल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भातपिकाला जीवदान मिळाल्याने शेतकरीवर्ग पुन्हा कामाला लागला आहे. (छायाचित्र : कांताराम भवारी)