शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील भात शेतीला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डिंभे : भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील सुमारे ५७ हजार ९६१ हेक्टर भात क्षेत्रापैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डिंभे : भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील सुमारे ५७ हजार ९६१ हेक्टर भात क्षेत्रापैकी ५४ हजार १०१ हेक्टर क्षेत्र यंदा लागवडीखाली आले आहे. जिल्ह्यात सुमारे ९३ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळाशी या भागातील भात उत्पादक शेतकरी धास्तावले होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील भातशेतीला जीवदान मिळाले असून. शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांकडून दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती केली जाते. भातशेती हेच या भागातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. येथील भातक्षेत्र हे प्रामख्याने जिरायती क्षेत्र केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडू लागली आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळाशी, भोर, वेल्हा हे तालुके भातशेतीचे आगर समजले जातात. या भागात आंबेमोहोर, इंद्रायणी, जिर, तांबडा रायभोग, बासमती या पारंपरिक वाणाबरोबरच विविध संकरित वणानांचीही लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्रापैकी ९३ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे.

चौकट

तालुका एकूण क्षेत्र (हेक्टर) लागवड झालेले क्षेत्र (हेक्टर) टक्के

जुन्नर १०,८०० १०,८०० १००.००

आंबेगाव. ५१३७ ४८२१ ९३.८४

खेड ७७५० ६६१० ८५.२९

हवेली २९५४ २९५४ १००

मुळशी ७७०० ६४५५ ८३.८३

भोर ७१४३ ७४८० १०४.७१

मावळ ११,५५० १०,१२१ ८७.६३

वेल्हे ४९३४ ४७१७ ९५.००

पुरंदर १०१२ ११४१ ११२.७५

चौकट

मागील महिन्यापासून पावसाने घेतलेली मोठी विश्रांती भात उत्पादक शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवू लागली होती. जुलै महिन्यातील अतिवृष्टीतून उरल्यासुरल्या हळव्या व गरव्या जातीच्या भातवाढीसाठी पावसाची नितांत गरज असतानाच पावसाने काढता पाय घेतल्याने खाचरातील पाणी आटून पिके पिवळी पडू लागली होती. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली असून, या पावसाने भातपिकाला जीवदान दिले आहे. यामुळे भात उत्पादक शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

कोट

यंदा अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले. उरलीसुरली शेतीही पाण्याअभावी वाया जाण्याची भीती वाटत होती. पण पावसाने जिवात जीव आला आहे. कशीबशी हातातोंडाशी गाठ पडण्याची अपेक्षा आहे - चंद्रकांत भवारी, भात उत्पादक शेतकरी

फोटो : अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार सुरुवात केल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भातपिकाला जीवदान मिळाल्याने शेतकरीवर्ग पुन्हा कामाला लागला आहे. (छायाचित्र : कांताराम भवारी)