शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

जिल्ह्यातील भात शेतीला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डिंभे : भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील सुमारे ५७ हजार ९६१ हेक्टर भात क्षेत्रापैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डिंभे : भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील सुमारे ५७ हजार ९६१ हेक्टर भात क्षेत्रापैकी ५४ हजार १०१ हेक्टर क्षेत्र यंदा लागवडीखाली आले आहे. जिल्ह्यात सुमारे ९३ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळाशी या भागातील भात उत्पादक शेतकरी धास्तावले होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील भातशेतीला जीवदान मिळाले असून. शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांकडून दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती केली जाते. भातशेती हेच या भागातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. येथील भातक्षेत्र हे प्रामख्याने जिरायती क्षेत्र केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडू लागली आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळाशी, भोर, वेल्हा हे तालुके भातशेतीचे आगर समजले जातात. या भागात आंबेमोहोर, इंद्रायणी, जिर, तांबडा रायभोग, बासमती या पारंपरिक वाणाबरोबरच विविध संकरित वणानांचीही लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्रापैकी ९३ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे.

चौकट

तालुका एकूण क्षेत्र (हेक्टर) लागवड झालेले क्षेत्र (हेक्टर) टक्के

जुन्नर १०,८०० १०,८०० १००.००

आंबेगाव. ५१३७ ४८२१ ९३.८४

खेड ७७५० ६६१० ८५.२९

हवेली २९५४ २९५४ १००

मुळशी ७७०० ६४५५ ८३.८३

भोर ७१४३ ७४८० १०४.७१

मावळ ११,५५० १०,१२१ ८७.६३

वेल्हे ४९३४ ४७१७ ९५.००

पुरंदर १०१२ ११४१ ११२.७५

चौकट

मागील महिन्यापासून पावसाने घेतलेली मोठी विश्रांती भात उत्पादक शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवू लागली होती. जुलै महिन्यातील अतिवृष्टीतून उरल्यासुरल्या हळव्या व गरव्या जातीच्या भातवाढीसाठी पावसाची नितांत गरज असतानाच पावसाने काढता पाय घेतल्याने खाचरातील पाणी आटून पिके पिवळी पडू लागली होती. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली असून, या पावसाने भातपिकाला जीवदान दिले आहे. यामुळे भात उत्पादक शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

कोट

यंदा अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले. उरलीसुरली शेतीही पाण्याअभावी वाया जाण्याची भीती वाटत होती. पण पावसाने जिवात जीव आला आहे. कशीबशी हातातोंडाशी गाठ पडण्याची अपेक्षा आहे - चंद्रकांत भवारी, भात उत्पादक शेतकरी

फोटो : अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार सुरुवात केल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भातपिकाला जीवदान मिळाल्याने शेतकरीवर्ग पुन्हा कामाला लागला आहे. (छायाचित्र : कांताराम भवारी)