शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यात ३३ औषधविक्रेत्यांचे परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:14 IST

पुणे : कोरोनाकाळात औषध विक्रीच्या व्यवसायात वाढ झाली आहे. कोरोनाच्या लक्षणांना घाबरलेले नागरिक अनेकदा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय थेट मेडिकल स्टोअरमध्ये ...

पुणे : कोरोनाकाळात औषध विक्रीच्या व्यवसायात वाढ झाली आहे. कोरोनाच्या लक्षणांना घाबरलेले नागरिक अनेकदा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय थेट मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन औषधे खरेदी करतात. चिठ्ठीशिवाय औषधे देण्यास अथवा जुन्याच चिठ्ठीच्या आधारे पुन्हा औषधे देण्यास कायद्याने बंदी आहे. अशी औषधे देणे, बंदी असलेली औषधे विकणे, बिलांची टॅली न होणे अशा विविध कारणांनी अन्न आणि औषध प्रशासनातर्फे पुणे जिल्ह्यामध्ये १४६ जणांचे परवाने निलंबित, तर ३३ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

परदेशात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधविक्रेते पेनकिलरही विकू शकत नाहीत. आपल्या देशातही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र, औषध विक्रेत्यांकडून बरेचदा हे नियम, कायदे पाळले जात नाहीत. नागरिकही केमिस्टकडून औषधे घेऊन डॉक्टरांच्या फीसाठी होणारा खर्च वाचवतात. कोरोना काळात सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास आपल्याला कोरोना झाला आहे की काय या भीतीने नागरिक डॉक्टरांकडे जाणे टाळतात. तात्पुरता आराम मिळावा, यासाठी अँटिबायोटिक घेण्यावर भर देतात. अन्न आणि औषध प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांची नियमितपणे तपासणी केली जाते. चिठ्ठीशिवाय औषधे देणे, बिलांमधील फेरफार अशा विविध कारणांमुळे प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

------------------------------

अशी झाली कारवाई

परवाने निलंबित परवाने रद्द

परिमंडळ-१ ४७ ६ परिमंडळ-२ ४० १८

परिमंडळ-३ ३६ ८

परिमंडळ-४ २३ १

--------------------------------------------

एकूण १४६ ३३

------------------------

अन्न आणि औषध प्रशासनाच्या निरीक्षकांकडून औषध दुकानांची नियमितपणे तपासणी केली जाते. बिलांची रक्कम न जुळणे, झोपेच्या गोळ्या परस्पर देणे, कागदपत्रांचे गणित न जुळणे अशा परिस्थितीत परवाने निलंबित किंवा रद्द केले जातात.

- डॉ. एस. बी. पाटील, सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

---------------------

कारणाशिवाय गरज नसताना अँटिबायोटिक्स घेतल्यास बॅकटेरियल रेझिस्टन्स निर्माण होतो. केमिस्टकडून थेट औषधे घेऊन रुग्ण डॉक्टरांच्या फीसाठी होणारा खर्च वाचवतात. औषधे विकली गेल्याने केमिस्टचाही फायदा होतो. औषधांचा डोस, त्याचे प्रमाण, त्यातील घटक यातील योग्यता-अयोग्यता पडताळून पहिली जात नाही. एखाद्या अँटिबायोटिक्सचा उपयोग झाला की वर्षानुवर्षे ती औषधे मनाने घेतली जातात. कालांतराने त्याचा प्रभाव कमी होतो. परदेशात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय साधी पेनकिलरही मिळत नाही. आपल्याकडेही कायद्याचा बडगा उगारणे आवश्यक आहे.

- डॉ. मीनल साळुंखे, जनरल फिजिशियन