शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

जिल्ह्यात ३३ औषधविक्रेत्यांचे परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:14 IST

पुणे : कोरोनाकाळात औषध विक्रीच्या व्यवसायात वाढ झाली आहे. कोरोनाच्या लक्षणांना घाबरलेले नागरिक अनेकदा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय थेट मेडिकल स्टोअरमध्ये ...

पुणे : कोरोनाकाळात औषध विक्रीच्या व्यवसायात वाढ झाली आहे. कोरोनाच्या लक्षणांना घाबरलेले नागरिक अनेकदा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय थेट मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन औषधे खरेदी करतात. चिठ्ठीशिवाय औषधे देण्यास अथवा जुन्याच चिठ्ठीच्या आधारे पुन्हा औषधे देण्यास कायद्याने बंदी आहे. अशी औषधे देणे, बंदी असलेली औषधे विकणे, बिलांची टॅली न होणे अशा विविध कारणांनी अन्न आणि औषध प्रशासनातर्फे पुणे जिल्ह्यामध्ये १४६ जणांचे परवाने निलंबित, तर ३३ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

परदेशात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधविक्रेते पेनकिलरही विकू शकत नाहीत. आपल्या देशातही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र, औषध विक्रेत्यांकडून बरेचदा हे नियम, कायदे पाळले जात नाहीत. नागरिकही केमिस्टकडून औषधे घेऊन डॉक्टरांच्या फीसाठी होणारा खर्च वाचवतात. कोरोना काळात सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास आपल्याला कोरोना झाला आहे की काय या भीतीने नागरिक डॉक्टरांकडे जाणे टाळतात. तात्पुरता आराम मिळावा, यासाठी अँटिबायोटिक घेण्यावर भर देतात. अन्न आणि औषध प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांची नियमितपणे तपासणी केली जाते. चिठ्ठीशिवाय औषधे देणे, बिलांमधील फेरफार अशा विविध कारणांमुळे प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

------------------------------

अशी झाली कारवाई

परवाने निलंबित परवाने रद्द

परिमंडळ-१ ४७ ६ परिमंडळ-२ ४० १८

परिमंडळ-३ ३६ ८

परिमंडळ-४ २३ १

--------------------------------------------

एकूण १४६ ३३

------------------------

अन्न आणि औषध प्रशासनाच्या निरीक्षकांकडून औषध दुकानांची नियमितपणे तपासणी केली जाते. बिलांची रक्कम न जुळणे, झोपेच्या गोळ्या परस्पर देणे, कागदपत्रांचे गणित न जुळणे अशा परिस्थितीत परवाने निलंबित किंवा रद्द केले जातात.

- डॉ. एस. बी. पाटील, सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

---------------------

कारणाशिवाय गरज नसताना अँटिबायोटिक्स घेतल्यास बॅकटेरियल रेझिस्टन्स निर्माण होतो. केमिस्टकडून थेट औषधे घेऊन रुग्ण डॉक्टरांच्या फीसाठी होणारा खर्च वाचवतात. औषधे विकली गेल्याने केमिस्टचाही फायदा होतो. औषधांचा डोस, त्याचे प्रमाण, त्यातील घटक यातील योग्यता-अयोग्यता पडताळून पहिली जात नाही. एखाद्या अँटिबायोटिक्सचा उपयोग झाला की वर्षानुवर्षे ती औषधे मनाने घेतली जातात. कालांतराने त्याचा प्रभाव कमी होतो. परदेशात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय साधी पेनकिलरही मिळत नाही. आपल्याकडेही कायद्याचा बडगा उगारणे आवश्यक आहे.

- डॉ. मीनल साळुंखे, जनरल फिजिशियन