शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

पातळी खालावली

By admin | Updated: July 9, 2015 02:05 IST

भीमा नदीपात्रातील पाणीपातळी खोलवर गेल्याने शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

देऊळगावराजे : येथील भीमा नदीपात्रातील पाणीपातळी खोलवर गेल्याने शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.ऐन पावसाळ्याच्या कालावधीत जून व जुलै या महिन्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने भीमा नदीपात्रातील पाणीपातळी खोलवर गेली आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत पपांना पाणी पुरत नसल्याने खर्च करून पाईप व केबल वायर वाढविण्याची वेळ आली आहे. ऐन पावसाळ्यात भीमा नदीची पाणीपातळी खोलवर गेल्यामुळे सध्याचा ऊसलागवडीचा हंगाम असतानाही शेतकरी ऊसलागवड करण्यास तयार नाही. कारण, लागवड करीत असताना शेतीचा मशागत खर्च, बेणे खर्च, मजूर खर्च हा अवाचा सवा होत आहे. दुसरीकडे, पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे ऊसलागवड करावी तरीही अडचण व न करावी तरीही अडचण, अशा दुहेरी चिंतेत शेतकरीवर्ग अडकला आहे. कारखान्यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे एफआरपीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना दिलेली नाही; त्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेले पीककर्ज भरण्याची ३० जूनची तारीख उलटून गेली. मात्र, पीककर्ज फेडणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. एकीकडे उसाची बिले वेळेवर मिळत नाहीत. पाणीप्रश्न, विजेचा प्रश्न या सर्व बाबींमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. परिणामी, कर्जमाफीची मागणी शेतकरीवर्गातून पुढे आली आहे. (वार्ताहर)पावसाने दडी मारल्याने बोअरवेलचा आधार> राजेगाव : पावसाने ओढ दिल्याने राजेगाव (ता. दौंड) परिसरात बोअरवेल (कूपनलिका) घेण्याचे काम सुरू झाले आहे. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काळेवाडी, ज्योतिबानगर, मलठण, वाटलूज, नायगाव आणि राजेगावच्या काही भागांत जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ४समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बाजरी, मका, कडवळ ही खरिपातील पिके घेण्याचा निर्णय त्याने घेतला. योग्य वापसा आल्यानंतर त्याने पेरणीही करून घेतली. परंतु, आज परंतु आज महिना होत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने आता दुबार पेरणी करावी लागते कि काय या विवंचनेत बळीराजा पडला आहे. > आठवडाभरात पाऊस झाला नाही, तर अंकुरलेली पिके हातची जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याने पावसाचा धावा करण्यास सुरुवात केली आहे. मेघराजाने आपली वक्रदृष्टी कायम ठेवली, तर खरीप हंगाम धोक्यात येऊन चारा आणि पाण्याचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. ४दौंड तालुक्यातील खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणीबेर्र्डी ही गावे उजनी धरणा तील पाणलोट क्षेत्रातील भागात येत असल्याने या भागातील शेतकरी ऊस हे पीक प्रामुख्याने घेत असतो. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊस लागवडही भरपूर केल्या आहेत. या भागात कमी पाऊस झाला, तरी खडकवासला धरण साखळी परिसरात भरपूर पाऊस पडून एकदा उजनी धरण भरले की या भागातील शेतकरी निवांत होतो.