शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

आम्हाला हक्काचे पाणी प्यायला द्या...!

By admin | Updated: May 7, 2017 01:45 IST

खाटिक गल्लीत पिण्यासाठी पाणी नाही, लाईट केव्हा येतात आणि केव्हा जातात, याचा ताळमेळ नसल्याने या भागातील रहिवाशांना

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : खाटिक गल्लीत पिण्यासाठी पाणी नाही, लाईट केव्हा येतात आणि केव्हा जातात, याचा ताळमेळ नसल्याने या भागातील रहिवाशांना विजेअभावी पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. तेव्हा खाटिक गल्लीत महिलांना पाणी मिळालेच पाहिजे, अशी भावना नगमा मण्यार यांनी विद्युत महवितरण कंपनीच्या कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत केला. मात्र, उपस्थित अधिकाऱ्यांनी विजेबाबत नियोजन सुरू आहे, असे सांगितल्यानंतर नागरिक शांत झाले.या वेळी महावितरण केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप भोळे म्हणाले, दौंडचा फिडर भारनियमनमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील, परिणामी जनतेला भारनियमनाला सामोरे जावे लागणार नाही. सध्या सुरू असलेले भारनियमन हे वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे. त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही. भारनियमनमुक्त करण्यासाठी वीज ग्राहकांनीदेखील वेळीच वीजबिले भरून सहकार्य करावे. या वेळी शहर अभियंता एस. व्ही. डोंबाळे म्हणाले, की नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे भारनियमनाच्यासंदर्भात योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र खटी म्हणाले, की कुठल्याही परिस्थितीत भारनियमन झाले नाही पाहिजे. आज आम्ही संयम बाळगला आहे, मात्र पुढच्या आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाहीत. नगरसेवक इंद्रजित जगदाळे म्हणाले, की भारनियमनाला वेळ नाही. भारनियमनाची वेळ ठरवून द्यावी. या वेळी उपकार्यकारी अभियंता दिलीप ठोंबरे, संदीप रणदिवे, जीवन ठोंबरे, सोहेल खान, बाबा शेख, नागसेन धेंडे, हरेश ओझा, अनिल सोनवणे, संतोष जताप, रामेश्वर मंत्री, अशोक जगदाळे, सचिन कुलथे उपस्थित होते.कारवाई केली जाईलविद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत बहुतांशी नागरकिांचा अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल नकारात्मक सूर होता. महावितरणचे अधिकारी मोबाईल कट करतात, कार्यालयातील दूरध्वनी उचलत नाहीत. यापुढे जर कोणी वीज ग्राहकांचा मोबाईल कट केला तर कडक कारवाई केली जाईल, अशा सूचना महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीत दौंड तालुका अपंग संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर मंत्री म्हणाले, की जर वीजबिल थकले म्हणून भारनियमन करीत असेल ही बाब चुकीची आहे. बड्या व्यक्तींची तसेच शासकीय कार्यालयातील थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गरिबांचे वीज कनेक्शन थकबाकीमध्ये कट केले जाते, असा दुजाभाव करू नका. बड्या लोकांच्या थकीत वीजबिलांची यादी आम्हाला द्या. ती यादी अपंग संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करतो, की जेणेकरून याचा फायदा महावितरणला होईल.