शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सरस्वतीची मंदिरे विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून निघू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:13 IST

आळंदी : कोरोना संसर्गजन्य आजारामुळे उद्भवलेली सर्व संकटे दूर करून देवी सरस्वतीची मंदिरे असलेल्या शाळा व महाविद्यालये पुन्हा एकदा ...

आळंदी : कोरोना संसर्गजन्य आजारामुळे उद्भवलेली सर्व संकटे दूर करून देवी सरस्वतीची मंदिरे असलेल्या शाळा व महाविद्यालये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून निघू दे ! असे साकडे श्रीज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने संतश्रेष्ठ माऊलींना घालण्यात आले.

तीर्थक्षेत्र आळंदी - देवाची (ता. खेड) येथे श्रीसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त श्री ज्ञानेश्वर विद्यालयात ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या नवव्या व बाराव्या अध्यायाचे पारायण कोविड नियमावलींचे पालन करत करण्यात आले. यावेळी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर कीर्तन पुष्प वाहत प्रबोधन केले.

याप्रसंगी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, ज्येष्ठ विश्वस्त प्रकाश काळे, सचिव अजित वडगावकर, प्राचार्य दिपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, अशोक बनकर, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, मुख्याध्यापक प्रदीप काळे, सांस्कृतिक समिती प्रमुख संजय उदमले, शिक्षक - शिक्षिका आदिंसह विद्यार्थी, पालक ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

दरम्यान कोरोनाच्या जागतिक संकटामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणामुळे मानसिक रुग्ण बनण्याच्या भीतीबरोबर काही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दूर राहून वाईट मार्गावर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे बालविवाह, व्यसनाधीनता अशा अनेक संकटांना खतपाणी मिळण्याचा धोका संभवतो आहे. त्यामुळे घातक संकटे दूर होऊ दे व पुन्हा नव्याने जनजीवन पूर्ववत होऊ दे, अशी विनवणी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी करण्यात आली. ऑनलाइनचे थेट प्रक्षेपण विद्यालयातील तंत्रस्नेही अध्यापक राहुल चव्हाण व राजेंद्र सोनवणे यांनी केले.

११ आळंदी

आळंदीतील श्री. ज्ञानेश्वर विद्यालयात ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अध्यायाचे पारायण करण्यात आले.