शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

‘शेट्टींना काय बोलायचे ते बोलू द्या...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “राजू शेट्टी नाराज असतील तर त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ‘राष्ट्रवादी’च्यावतीने जी यादी मुख्यमत्री, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “राजू शेट्टी नाराज असतील तर त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ‘राष्ट्रवादी’च्यावतीने जी यादी मुख्यमत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिली त्यात सहकार, शेतीच्या क्षेत्रात शेट्टींनी जे योगदान दिले ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणानं केलं आहे,” असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पाठविले जाणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून चालू आहे. त्यांच्यासह अन्य अकरा जणांची यादी महाआघाडी सरकारने राज्यपालांकडे दिली आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर शेट्टी यांचे नाव या यादीतून वगळले असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सांगत पवार यांनी यावरुन उठलेल्या वादगांवर पडदा टाकला. महापालिकेच्या शाळेच्या उद्घाटनानंतर पवार शनिवारी (दि.४) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

“आमदार नियुक्तीसंबंधीचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. त्यामुळे एकदा हा निर्णय आम्ही घेतल्यानंतर या बद्दल अंतिम भूमिका राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटते की अशा प्रकारची विधाने कशी केली जातात,” असे म्हणत पवारांनी राजू शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दलही नाराजी व्यक्त केली. पवार म्हणाले, “आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केले. राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचे असेल तर मला त्यावर भाष्य करायचे नाही. आम्ही दिलेला शब्द पाळलेला आहे. राज्यपाल काय करताहेत त्याची आम्ही वाट बघतोय.”

चौकट

तारतम्य ठेवण्याचा सल्ला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले, “फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिणेतील काही राज्यांमध्येही अशा प्रकारच्या कारवाया होत आहेत. ईडीचा गैरवापर महाराष्ट्रापुरता सीमीत नाही.” भाजप, मनसे या पक्षांनी मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनांबाबत त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने राज्य सरकारांना कोरोना साथीसंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात आणखी काही दिवस खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. “अन्य घटकांची याबाबत काही मते असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र केंद्र सरकारच्या विचाराचे जे लोक राज्यात आहेत त्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे,” असा चिमटा पवारांनी राज्यातील भाजपला काढला.