शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘शेट्टींना काय बोलायचे ते बोलू द्या...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “राजू शेट्टी नाराज असतील तर त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ‘राष्ट्रवादी’च्यावतीने जी यादी मुख्यमत्री, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “राजू शेट्टी नाराज असतील तर त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ‘राष्ट्रवादी’च्यावतीने जी यादी मुख्यमत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिली त्यात सहकार, शेतीच्या क्षेत्रात शेट्टींनी जे योगदान दिले ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणानं केलं आहे,” असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पाठविले जाणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून चालू आहे. त्यांच्यासह अन्य अकरा जणांची यादी महाआघाडी सरकारने राज्यपालांकडे दिली आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर शेट्टी यांचे नाव या यादीतून वगळले असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सांगत पवार यांनी यावरुन उठलेल्या वादगांवर पडदा टाकला. महापालिकेच्या शाळेच्या उद्घाटनानंतर पवार शनिवारी (दि.४) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

“आमदार नियुक्तीसंबंधीचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. त्यामुळे एकदा हा निर्णय आम्ही घेतल्यानंतर या बद्दल अंतिम भूमिका राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटते की अशा प्रकारची विधाने कशी केली जातात,” असे म्हणत पवारांनी राजू शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दलही नाराजी व्यक्त केली. पवार म्हणाले, “आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केले. राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचे असेल तर मला त्यावर भाष्य करायचे नाही. आम्ही दिलेला शब्द पाळलेला आहे. राज्यपाल काय करताहेत त्याची आम्ही वाट बघतोय.”

चौकट

तारतम्य ठेवण्याचा सल्ला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले, “फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिणेतील काही राज्यांमध्येही अशा प्रकारच्या कारवाया होत आहेत. ईडीचा गैरवापर महाराष्ट्रापुरता सीमीत नाही.” भाजप, मनसे या पक्षांनी मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनांबाबत त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने राज्य सरकारांना कोरोना साथीसंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात आणखी काही दिवस खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. “अन्य घटकांची याबाबत काही मते असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र केंद्र सरकारच्या विचाराचे जे लोक राज्यात आहेत त्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे,” असा चिमटा पवारांनी राज्यातील भाजपला काढला.