शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘शेट्टींना काय बोलायचे ते बोलू द्या...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “राजू शेट्टी नाराज असतील तर त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ‘राष्ट्रवादी’च्यावतीने जी यादी मुख्यमत्री, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “राजू शेट्टी नाराज असतील तर त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ‘राष्ट्रवादी’च्यावतीने जी यादी मुख्यमत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिली त्यात सहकार, शेतीच्या क्षेत्रात शेट्टींनी जे योगदान दिले ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणानं केलं आहे,” असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पाठविले जाणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून चालू आहे. त्यांच्यासह अन्य अकरा जणांची यादी महाआघाडी सरकारने राज्यपालांकडे दिली आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर शेट्टी यांचे नाव या यादीतून वगळले असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सांगत पवार यांनी यावरुन उठलेल्या वादगांवर पडदा टाकला. महापालिकेच्या शाळेच्या उद्घाटनानंतर पवार शनिवारी (दि.४) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

“आमदार नियुक्तीसंबंधीचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. त्यामुळे एकदा हा निर्णय आम्ही घेतल्यानंतर या बद्दल अंतिम भूमिका राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटते की अशा प्रकारची विधाने कशी केली जातात,” असे म्हणत पवारांनी राजू शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दलही नाराजी व्यक्त केली. पवार म्हणाले, “आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केले. राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचे असेल तर मला त्यावर भाष्य करायचे नाही. आम्ही दिलेला शब्द पाळलेला आहे. राज्यपाल काय करताहेत त्याची आम्ही वाट बघतोय.”

चौकट

तारतम्य ठेवण्याचा सल्ला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले, “फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिणेतील काही राज्यांमध्येही अशा प्रकारच्या कारवाया होत आहेत. ईडीचा गैरवापर महाराष्ट्रापुरता सीमीत नाही.” भाजप, मनसे या पक्षांनी मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनांबाबत त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने राज्य सरकारांना कोरोना साथीसंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात आणखी काही दिवस खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. “अन्य घटकांची याबाबत काही मते असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र केंद्र सरकारच्या विचाराचे जे लोक राज्यात आहेत त्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे,” असा चिमटा पवारांनी राज्यातील भाजपला काढला.