शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यात प्रशासनासह नेते उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST

भानुदास पऱ्हाड आळंदी : औद्योगिक वसाहतींमधील घातक रसायनमिश्रित पाणी व कचरा इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. तर ...

भानुदास पऱ्हाड

आळंदी : औद्योगिक वसाहतींमधील घातक रसायनमिश्रित पाणी व कचरा इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. तर मैलामिश्रित सांडपाणी बिनधास्तपणे नदीपात्रात सोडले येत आहे. मात्र हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आजवरचे नगरपरिषदेचा कारभार हाकणारे नेते तसेच प्रशासकीय अधिकारी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे आळंदी शहाराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजतागायत सुटू शकला नाही ही गंभीर बाब आहे.

इंद्रायणीच्या काठावर वसलेल्या अलंकापुरी शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. तर शहरालगतच्या पश्चिमेला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचीही लोकसंख्या लाखांच्या पुढे आहे. तर ही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीत विविध कारखाने सुरू आहेत. परिणामी या शहरातील मैलामिश्रित सांडपाणी तसेच शहरातील ज्या-ज्या उद्योगात किंवा व्यवसायात स्वच्छतेसाठी, प्रक्रियेसाठी पाण्याचा उपयोग करून झाल्यानंतर रसायनमिश्रित पाणी विनाप्रक्रिया सरळसरळ इंद्रायणीच्या नदीपात्रात छुप्या मार्गाने सोडले जात आहे. त्यामुळे नदीप्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे.

पिंपरी चिंचवड व आळंदी शहर विकासासाठी गेल्या अनेक वर्षांत विविध विकास आराखडे तयार करण्यात आले. त्यातून अनेक विकासकामांसह गटारींची कामे करण्यात आली. मात्र या गटारींमधून वाहून जाणारे सांडपाणी योग्य ठिकाणी सोडण्यासंदर्भात कार्यवाही न झाल्याने लाखो लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. विशेष म्हणजे दोन्हीही शहरांतील वाढती लोकसंख्या गृहीत धरून चांगल्या पाण्याची मागणी करण्यात आली. परंतु सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. परिणामी आळंदीचे वैभव असणाऱ्या इंद्रायणीची अवस्था बिकट होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करत आहे.

अलंकापुरीत माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी नित्याने राज्याचा कारभार हाकणारे वरिष्ठ नेते, पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी येत आहेत. 'श्रीं'चे दर्शन घेतल्यानंतर सर्वच राजकीय नेते व प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी इंद्रायणी नदीची पाहणी करून चिंता व्यक्त करतात. विशेष म्हणजे इंद्रायणीला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तत्काळ उपाययोजना कार्यान्वित करण्याच्या अनेक जबाबदार नेत्यांनी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. मात्र या सर्व सूचना आजतागायत फक्त आश्वासन बनून हवेत विरल्या आहेत.

" इंद्रायणीत पिंपरी-चिंचवड शहरातून सांडपाणी व घातक रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून यावर उपाययोजना करण्यासंदर्भात अभ्यासपूर्ण कृतिशील कार्यक्रम होणे अपेक्षित होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नदीतील पाणीप्रदूषण वाढत चालले आहे.

-

निसार सय्यद, अविरत फाऊंडेशन आळंदी.

" इंद्रायणीच्या स्वच्छतेसाठी पाऊले उचलली जातील. पिंपरी-चिंचवड हद्दीतील सांडपाणी रोखण्यासंदर्भात विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे.

-

अंकुश जाधव, मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद.

आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीतील पाण्याची तसेच नदीपात्राची झालेली भयावह अवस्था.