शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यात प्रशासनासह नेते उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST

भानुदास पऱ्हाड आळंदी : औद्योगिक वसाहतींमधील घातक रसायनमिश्रित पाणी व कचरा इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. तर ...

भानुदास पऱ्हाड

आळंदी : औद्योगिक वसाहतींमधील घातक रसायनमिश्रित पाणी व कचरा इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. तर मैलामिश्रित सांडपाणी बिनधास्तपणे नदीपात्रात सोडले येत आहे. मात्र हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आजवरचे नगरपरिषदेचा कारभार हाकणारे नेते तसेच प्रशासकीय अधिकारी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे आळंदी शहाराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजतागायत सुटू शकला नाही ही गंभीर बाब आहे.

इंद्रायणीच्या काठावर वसलेल्या अलंकापुरी शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. तर शहरालगतच्या पश्चिमेला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचीही लोकसंख्या लाखांच्या पुढे आहे. तर ही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीत विविध कारखाने सुरू आहेत. परिणामी या शहरातील मैलामिश्रित सांडपाणी तसेच शहरातील ज्या-ज्या उद्योगात किंवा व्यवसायात स्वच्छतेसाठी, प्रक्रियेसाठी पाण्याचा उपयोग करून झाल्यानंतर रसायनमिश्रित पाणी विनाप्रक्रिया सरळसरळ इंद्रायणीच्या नदीपात्रात छुप्या मार्गाने सोडले जात आहे. त्यामुळे नदीप्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे.

पिंपरी चिंचवड व आळंदी शहर विकासासाठी गेल्या अनेक वर्षांत विविध विकास आराखडे तयार करण्यात आले. त्यातून अनेक विकासकामांसह गटारींची कामे करण्यात आली. मात्र या गटारींमधून वाहून जाणारे सांडपाणी योग्य ठिकाणी सोडण्यासंदर्भात कार्यवाही न झाल्याने लाखो लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. विशेष म्हणजे दोन्हीही शहरांतील वाढती लोकसंख्या गृहीत धरून चांगल्या पाण्याची मागणी करण्यात आली. परंतु सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. परिणामी आळंदीचे वैभव असणाऱ्या इंद्रायणीची अवस्था बिकट होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करत आहे.

अलंकापुरीत माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी नित्याने राज्याचा कारभार हाकणारे वरिष्ठ नेते, पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी येत आहेत. 'श्रीं'चे दर्शन घेतल्यानंतर सर्वच राजकीय नेते व प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी इंद्रायणी नदीची पाहणी करून चिंता व्यक्त करतात. विशेष म्हणजे इंद्रायणीला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तत्काळ उपाययोजना कार्यान्वित करण्याच्या अनेक जबाबदार नेत्यांनी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. मात्र या सर्व सूचना आजतागायत फक्त आश्वासन बनून हवेत विरल्या आहेत.

" इंद्रायणीत पिंपरी-चिंचवड शहरातून सांडपाणी व घातक रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून यावर उपाययोजना करण्यासंदर्भात अभ्यासपूर्ण कृतिशील कार्यक्रम होणे अपेक्षित होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नदीतील पाणीप्रदूषण वाढत चालले आहे.

-

निसार सय्यद, अविरत फाऊंडेशन आळंदी.

" इंद्रायणीच्या स्वच्छतेसाठी पाऊले उचलली जातील. पिंपरी-चिंचवड हद्दीतील सांडपाणी रोखण्यासंदर्भात विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे.

-

अंकुश जाधव, मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद.

आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीतील पाण्याची तसेच नदीपात्राची झालेली भयावह अवस्था.