शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यात प्रशासनासह नेते उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST

भानुदास पऱ्हाड आळंदी : औद्योगिक वसाहतींमधील घातक रसायनमिश्रित पाणी व कचरा इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. तर ...

भानुदास पऱ्हाड

आळंदी : औद्योगिक वसाहतींमधील घातक रसायनमिश्रित पाणी व कचरा इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. तर मैलामिश्रित सांडपाणी बिनधास्तपणे नदीपात्रात सोडले येत आहे. मात्र हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आजवरचे नगरपरिषदेचा कारभार हाकणारे नेते तसेच प्रशासकीय अधिकारी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे आळंदी शहाराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजतागायत सुटू शकला नाही ही गंभीर बाब आहे.

इंद्रायणीच्या काठावर वसलेल्या अलंकापुरी शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. तर शहरालगतच्या पश्चिमेला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचीही लोकसंख्या लाखांच्या पुढे आहे. तर ही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीत विविध कारखाने सुरू आहेत. परिणामी या शहरातील मैलामिश्रित सांडपाणी तसेच शहरातील ज्या-ज्या उद्योगात किंवा व्यवसायात स्वच्छतेसाठी, प्रक्रियेसाठी पाण्याचा उपयोग करून झाल्यानंतर रसायनमिश्रित पाणी विनाप्रक्रिया सरळसरळ इंद्रायणीच्या नदीपात्रात छुप्या मार्गाने सोडले जात आहे. त्यामुळे नदीप्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे.

पिंपरी चिंचवड व आळंदी शहर विकासासाठी गेल्या अनेक वर्षांत विविध विकास आराखडे तयार करण्यात आले. त्यातून अनेक विकासकामांसह गटारींची कामे करण्यात आली. मात्र या गटारींमधून वाहून जाणारे सांडपाणी योग्य ठिकाणी सोडण्यासंदर्भात कार्यवाही न झाल्याने लाखो लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. विशेष म्हणजे दोन्हीही शहरांतील वाढती लोकसंख्या गृहीत धरून चांगल्या पाण्याची मागणी करण्यात आली. परंतु सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. परिणामी आळंदीचे वैभव असणाऱ्या इंद्रायणीची अवस्था बिकट होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करत आहे.

अलंकापुरीत माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी नित्याने राज्याचा कारभार हाकणारे वरिष्ठ नेते, पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी येत आहेत. 'श्रीं'चे दर्शन घेतल्यानंतर सर्वच राजकीय नेते व प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी इंद्रायणी नदीची पाहणी करून चिंता व्यक्त करतात. विशेष म्हणजे इंद्रायणीला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तत्काळ उपाययोजना कार्यान्वित करण्याच्या अनेक जबाबदार नेत्यांनी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. मात्र या सर्व सूचना आजतागायत फक्त आश्वासन बनून हवेत विरल्या आहेत.

" इंद्रायणीत पिंपरी-चिंचवड शहरातून सांडपाणी व घातक रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून यावर उपाययोजना करण्यासंदर्भात अभ्यासपूर्ण कृतिशील कार्यक्रम होणे अपेक्षित होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नदीतील पाणीप्रदूषण वाढत चालले आहे.

-

निसार सय्यद, अविरत फाऊंडेशन आळंदी.

" इंद्रायणीच्या स्वच्छतेसाठी पाऊले उचलली जातील. पिंपरी-चिंचवड हद्दीतील सांडपाणी रोखण्यासंदर्भात विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे.

-

अंकुश जाधव, मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद.

आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीतील पाण्याची तसेच नदीपात्राची झालेली भयावह अवस्था.