शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यात प्रशासनासह नेते उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST

भानुदास पऱ्हाड आळंदी : औद्योगिक वसाहतींमधील घातक रसायनमिश्रित पाणी व कचरा इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. तर ...

भानुदास पऱ्हाड

आळंदी : औद्योगिक वसाहतींमधील घातक रसायनमिश्रित पाणी व कचरा इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. तर मैलामिश्रित सांडपाणी बिनधास्तपणे नदीपात्रात सोडले येत आहे. मात्र हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आजवरचे नगरपरिषदेचा कारभार हाकणारे नेते तसेच प्रशासकीय अधिकारी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे आळंदी शहाराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजतागायत सुटू शकला नाही ही गंभीर बाब आहे.

इंद्रायणीच्या काठावर वसलेल्या अलंकापुरी शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. तर शहरालगतच्या पश्चिमेला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचीही लोकसंख्या लाखांच्या पुढे आहे. तर ही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीत विविध कारखाने सुरू आहेत. परिणामी या शहरातील मैलामिश्रित सांडपाणी तसेच शहरातील ज्या-ज्या उद्योगात किंवा व्यवसायात स्वच्छतेसाठी, प्रक्रियेसाठी पाण्याचा उपयोग करून झाल्यानंतर रसायनमिश्रित पाणी विनाप्रक्रिया सरळसरळ इंद्रायणीच्या नदीपात्रात छुप्या मार्गाने सोडले जात आहे. त्यामुळे नदीप्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे.

पिंपरी चिंचवड व आळंदी शहर विकासासाठी गेल्या अनेक वर्षांत विविध विकास आराखडे तयार करण्यात आले. त्यातून अनेक विकासकामांसह गटारींची कामे करण्यात आली. मात्र या गटारींमधून वाहून जाणारे सांडपाणी योग्य ठिकाणी सोडण्यासंदर्भात कार्यवाही न झाल्याने लाखो लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. विशेष म्हणजे दोन्हीही शहरांतील वाढती लोकसंख्या गृहीत धरून चांगल्या पाण्याची मागणी करण्यात आली. परंतु सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. परिणामी आळंदीचे वैभव असणाऱ्या इंद्रायणीची अवस्था बिकट होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करत आहे.

अलंकापुरीत माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी नित्याने राज्याचा कारभार हाकणारे वरिष्ठ नेते, पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी येत आहेत. 'श्रीं'चे दर्शन घेतल्यानंतर सर्वच राजकीय नेते व प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी इंद्रायणी नदीची पाहणी करून चिंता व्यक्त करतात. विशेष म्हणजे इंद्रायणीला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तत्काळ उपाययोजना कार्यान्वित करण्याच्या अनेक जबाबदार नेत्यांनी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. मात्र या सर्व सूचना आजतागायत फक्त आश्वासन बनून हवेत विरल्या आहेत.

" इंद्रायणीत पिंपरी-चिंचवड शहरातून सांडपाणी व घातक रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून यावर उपाययोजना करण्यासंदर्भात अभ्यासपूर्ण कृतिशील कार्यक्रम होणे अपेक्षित होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नदीतील पाणीप्रदूषण वाढत चालले आहे.

-

निसार सय्यद, अविरत फाऊंडेशन आळंदी.

" इंद्रायणीच्या स्वच्छतेसाठी पाऊले उचलली जातील. पिंपरी-चिंचवड हद्दीतील सांडपाणी रोखण्यासंदर्भात विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे.

-

अंकुश जाधव, मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद.

आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीतील पाण्याची तसेच नदीपात्राची झालेली भयावह अवस्था.