शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजनाने सजली दिवाळीची सायंकाळ

By admin | Updated: November 12, 2015 02:38 IST

दिवाळीतील महत्त्वाचा मानला जाणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळच्या अभ्यंगस्नानानंतर नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत फराळ

पुणे : दिवाळीतील महत्त्वाचा मानला जाणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळच्या अभ्यंगस्नानानंतर नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत फराळ आणि जेवणाचा आनंद लुटून सायंकाळी पूजेसाठी घरातील सर्व मंडळी एकत्रित जमल्याचे चित्र घरोघरी पाहायला मिळाले. वर्षभर मिळालेल्या संपत्तीची पूजा करून हा दिवस साजरा केला जातो. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यामुळे हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेऊन, तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. लक्ष्मी हे स्वच्छतेचे प्रतीक मानले जात असल्याने अशाप्रकारे केरसुणीची पूजा करण्यात येते. त्यापद्धतीने घरोघरी अशी पूजा करण्यात आली.घरातील सोने, नवीन वस्तू, हिशेबाच्या वह्या, बँकेची महत्त्वाची कागदपत्रे यांची मनोभावे पूजा केली जाते. येणाऱ्या वर्षात लक्ष्मीची आपल्यावर अशीच कृपा राहू दे, यासाठी प्रार्थना करण्याची पद्धत आहे. त्यानुसार नागरिकांनी देवाकडे येणारे वर्ष भरभराटीचे जाऊ दे, अशी प्रार्थना केली. या वेळी चांदीची व सोन्याची लक्ष्मी असलेली नाणी पूजली जातात. त्यांना धने व गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो. लाह्या या समृद्धीचे प्रतीक मानल्या जात असल्याने लाह्या आणि बत्तासे यांचाही नैवेद्य दाखविण्यात येतो. त्याप्रमाणे साग्रसंगीत पूजा घरोघरी करण्यात आल्याचे चित्र होते. सोसायटीतील सुवासिनींना बोलावून त्यांना हळदी-कुंकू लावून हा प्रसाद दिला जातो. शहरातही फ्लॅटसंस्कृतीचे प्रमाण वाढले असले, तरीही अशाप्रकारे महिला एकमेकींकडे जाऊन सण साजरा करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या दिवशी दारात रांगोळी काढून पणत्यांनी परिसर उजळून टाकण्यात आला होता. आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशात जीवनातील अंधकार दूर होऊन जीवन प्रकाशमान व्हावे, अशी यामागील मुख्य धारणा असते. आश्विन शुद्ध अमावस्या म्हणजेच ‘लक्ष्मीपूजन’ हा दिवस त्याला अपवाद असून, तो चांगला मानला जातो. सर्व अघटित घटना मागे सारून नव्याने जीवनाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने या दिवसाकडे पाहिले जाते. एरवी सायंकाळच्या वेळी केर काढत नाहीत; मात्र या दिवशी पूजा केलेल्या केरसुणीने सायंकाळी केर काढून घरातील अनिष्ट गोष्टी घराबाहेर घालवायच्या, अशीही धारणा रुढ आहे.