शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटात भूदृश्यकला प्रेक्षकांवर उमटवते ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चित्रपटात भूदृश्यकला (लॅण्डस्केप) केवळ पार्श्वभूमी म्हणून वापरले जात नसून, ते त्यातील कथा, आशय, अभिव्यक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : चित्रपटात भूदृश्यकला (लॅण्डस्केप) केवळ पार्श्वभूमी म्हणून वापरले जात नसून, ते त्यातील कथा, आशय, अभिव्यक्ती म्हणून एक जिवंत पात्राची भूमिकाही करत असते. प्रेक्षकाच्या मनावर याचा अप्रत्यक्ष, पण खोल परिणाम होत असतो. चित्रपटात निवडलेली ठिकाणे, तेथील निसर्ग, त्यातील विविध आवाज हे मानवी पातळीवरील वास्तव मात्र चित्रपटातून प्रतीकात्मक पद्धतीने अभिव्यक्त होत असते, अशा शब्दात वास्तुरचनाकार असणाऱ्या चित्रपटमाध्यमांशी संबंधित तीन तरुण अभ्यासकांनी चित्रपटातील भूदृश्यकलेचे महत्त्व विशद केले. या चर्चेसाठी जगभरातील चार प्रसिद्ध चित्रपट निवडण्यात आले होते.

महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) लॅण्डस्केप (भूदृश्यकला) विभागातर्फे ‘जागतिक लॅण्डस्केप वास्तूरचनाकार महिना’ नुकताच साजरा केला. त्यानिमित्ताने ’चित्रपटातील भूदृश्यकला’ हा अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजिला होता. क्साय डिझाईन कन्सल्टंट्सचे संस्थापक, वास्तुरचनाकार आणि छायाचित्रणकार सचिन बोकिल, ब्रिक स्कूल ऑफ इंटिरियर डिझाईनचे विभागप्रमुख, वास्तुरचनाकार आणि कलावंत मयूरेश शिरोळकर, आणि दिल्लीच्या हजेलअर्थ स्टुडिओचे संस्थापक, भूशास्त्रकला वास्तुरचनाकार आणि रेखाचित्रकार नाईक सहभागी झाले होते.

नाईक यांनी चित्रपटातून निसर्गाचा म्हणजेच भूदृश्याचा एक मोठा पट समोर मांडला जातो. असे असले तरी निसर्ग हा एरव्ही न मोजता येणारा अमूर्त तसेच अवर्णनीय असतो. ते दृश्य त्या निसर्गाचे प्रातिनिधिक स्वरूप असते व प्रेक्षकांशी ते भावनिक नात्याने जोडले जात असल्याचे सांगितले.

सचिन बोकिल म्हणाले की, चित्रपटांमधील पूरक भूदृश्यातून त्यामागचा दृष्टिकोन समजावून घेताना त्यातून मानवी जीवनातील आनंदाचा एक तुकडाच समोर ठेवला जातो. यात कथेच्या गरजेनुसार नैसर्गिक किंवा भूदृश्य बाह्य परिस्थिती ठरवली जाते. त्यातून कथेचा भाव (मूड) अधिक समृद्ध केला जातो. तसेच कथेतील पात्रं आणि पार्श्वभूमी यांचा मेळ घालताना दुग्धशर्करा योग साधला जातो. तसेच प्रेक्षकांना त्यांच्या पंचेंद्रियांची संवेद्य अनुभूती देण्याचा प्रयत्न असतो. यातून चित्रपट हा प्रतीकात्मकतेकडून वास्तवतेकडे जातो. त्याचा उलट प्रवास होत नाही.

सौरभी नाईक यांनी महिला भूदृश्यकला वास्तुरचनाकार आणि चित्रपट यांचे जवळचे नाते आहे.पूर्वी पुरेशा अभिव्यक्त न होणाऱ्या स्त्रीला आता स्वत:तील संवेदनशीलता अधिक मुक्तपणे मांडता येईल, तसेच निसर्गातील विविध रुपांशी जोडले जाता येईल.