शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावकरांना चासकमान देईना पाणी उचलण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST

कोरेगाव भीमा : चासकमान विस्थापितांसाठी तब्बल ७५० एकर जमीन (तीनशे हेक्टर) देणाऱ्या कोरेगाव-भीमा (ता. शिरूर) ग्रामस्थांना चासकमान खाते आता ...

कोरेगाव भीमा :

चासकमान विस्थापितांसाठी तब्बल ७५० एकर जमीन (तीनशे हेक्टर) देणाऱ्या कोरेगाव-भीमा (ता. शिरूर) ग्रामस्थांना चासकमान खाते आता पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी पाणीउचल परवानगी देईना. विशेष म्हणजे कोरेगावकरांनी आपल्या कुशीत नवीन गाव म्हणून वाडा-पुनर्वसन गाव सन १९८७ मध्ये आनंदाने वसवून घेतले. मात्र हा त्यागच कोरेगावकरांसाठी दुर्दैवाचा फेरा ठरल्याने गावात मोठा जनक्षोभ वाढत चालला आहे.

चासकमान धरणग्रस्तांसाठी १९८७ साली कोरेगाव भीमा या ठिकाणी तब्बल साडेसातशे एकर जमीन (तीनशे हेक्टर) धरणग्रस्तांना वाटप करण्यात आली. त्याचबरोबर कोरेगावकरांनी आपल्या कुशीत वाडा पुनर्वसन नावाचे नवीन गाव तयार करण्यात आले. शेकडो एकर गावची जमीन चासकमानसाठी कवडीमोल किमतीत शेतकऱ्यांची जाऊनही शेतकऱ्यांसाठी पाण्याचा कोणताही पक्क्या कॅनॉलची या ठिकाणी निर्मिती तर पाटबंधारे विभागाने केली तर नाहीच शिवाय शेतीसाठीही वेळवर पाणी उचलताही येत नाही. याबबात आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांच्याकडे ग्रामस्थांनी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

कोरेगाव भीमासारख्या औद्योगिकदृष्ट्या मोठ्या ग्रामपंचायतीने १९८५ साली वढू खुर्द येथे विहीर, पाण्याच्या टाक्याद्वारे गावाला पाणीपुरवठा करण्यात आला. २०१० साली या ठिकानी सँड फिल्टरद्वारे शुध्द पाणीपुरवठा केला. मात्र पस्तीस वर्षांपूर्वीची विहीर व २०१० सालचा प्रकल्प वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरा पडू लागला आहे. गावाला गायरान व गावची जागा नसल्याने मोठा शुद्ध पाणी प्रकल्प करता येत नाही. गावच्या उपयोगासाठी वनक्षेत्राची जागा मिळत असल्याने जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पुन्हा पाणी योजनेचा प्रस्ताव तयार करुन वढू बंधाऱ्यातून पाणी उचलण्याची परवानगी पाटबंधारे विभागाकडे मागितल्यावर तेथील अभियंता विजय फुंदे यांनी पाणी उचलण्याची परवानगी देता येणार नसल्याचे सांगितले.

धरणात साठा नसल्याने परवानगी देता येत नाही

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वाघोली योजना व इतर योजनांमुळे साठा शिल्लक राहत नसल्याने पाणी उचलण्याची परवानगी देता येणार नसल्याचे सांगत चासकमान कालव्यातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी उचलून ते साठवण तलाव करुन त्यात पाणी सोडण्यासाठी परवानगी देता येईल, असे पाटबंधारे खात्याचे विजय फुंदे यांनी सांगितले.

आमचंच गाव वंचित का?

भीमा नदीवरून वाघोली, लोणी कंद, सणसवाडी, पेरणे अनेक गावांच्या पेयजल योजना व अनेक खाजगी उद्योगांना पाणी उचलण्याची परवानगी दिली असताना आमच्या गावची चासकमान धरणग्रस्तांसाठी साडेसातशे एकर जमीन जाऊनही या धरणाच्या पाण्यापासून आमचंच गाव वंचित का? असा सवाल सरपंच अमोल गव्हाणे यांनी केला आहे.