शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

कोंढापुरी तलाव कोरडा

By admin | Updated: May 31, 2016 02:06 IST

कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावातील पाणी संपुष्टात आले आहे. या तलावावर अवलंबून असणारी रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची सुमारे २० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णपणे

रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील तलावातील पाणी संपुष्टात आले आहे. या तलावावर अवलंबून असणारी रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची सुमारे २० कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.खेड तालुक्यातील थिगळस्थळ येथे चासकमानच्या डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने चालू महिन्याच्या सुरुवातीला सोडलेल्या पाण्याच्या आवर्तनाचे लाखो लिटर पाणी ऐन दुष्काळी परिस्थितीत वाया गेल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी केला आहे. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर शासनाने कारवाई करावी, अशी मागणीही पाचुंदकर यांनी केली आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीने सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शेतकरी होरपळत असताना असे बेजबाबदार कृत्य करणाऱ्यांना चांगला धडा शिकविणे गरजेचे असल्याचेही पाचुंदकर यांनी म्हटले आहे. रांजणगाव गणपतीसह परिसरातील ७ ते ८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोंढापुरी तलावावर अवलंबून आहे. या तळ्यातील पाणीसाठा शेवटच्या घटका मोजत असल्याने चासकमानचे पाणी तलावात सोडण्याची मागणी यापूर्वीच केलेली होती. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा अत्यल्प दाब आणि चासकमानच्या अधिकाऱ्यांसह शासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आज रांजणगावसह परिसरातील ६ ते ७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा खोडसाळ प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई प्रशासनाने करावी, अशी मागणी पाचुंदकर यांनी केली होती. परंतु, प्रशासनाने त्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नसल्याने आज रांजणगावकरांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. रांजणगावची स्थायी व अस्थायी मिळून मोठी लोकस्ांख्या असून पाणीप्रश्न बिकट बनला आहे. , दिवसाआड नागरिकांना पाणी देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून केला जात आहे.त्यामुळे परिसरातील गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.(वार्ताहर)