शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

किसान रेल्वे सुसाट...आधी डाळींब, तर आता आंब्याची ‘दिल्ली’वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:09 IST

प्रसाद कानडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऑगस्ट २०२० मध्ये सांगोला रेल्वे स्थानकावरून सुरू झालेल्या किसान रेल्वेचा प्रवास ...

प्रसाद कानडे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ऑगस्ट २०२० मध्ये सांगोला रेल्वे स्थानकावरून सुरू झालेल्या किसान रेल्वेचा प्रवास सुसाट आहे. डाळींब, चिकू, अननस, द्राक्षे, केळी अशा फळांची वाहतूक झाल्यावर आता आंब्याची वाहतूक सुरू आहे. सांगोला, कुर्डुवाडी परिसरातील आंबे थेट दिल्लीला पाठविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी दिल्ली (आदर्श नगर) ला ६ टन आंबे किसान रेल्वेने पाठविण्यात आले आहेत.

किसान रेल्वेला पश्चिम महाराष्ट्रतील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत जवळपास २४ हजार ७०९ टन मालाची वाहतूक सोलापूर रेल्वे विभागातील एकट्या सांगोला रेल्वे स्थानकावरून झाली आहे. डाळींब, द्राक्षे व केळी याची मोठ्या प्रमाणात वाहतूक झाली आहे. सोलापूर वगळता पुणे, नाशिक, अहमदनगर येथून देखील किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद लाभला. किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकरी आपला माल उत्तर भारत, तसेच पश्चिम बंगाल आदी ठिकाणी पाठवत आहे. किसान रेल्वे अन्य वाहतुकीच्या साधनाच्या तुलनेने जलद व कमी खर्चिक असल्याने शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

बॉक्स १

कोणत्या फळांची झाली वाहतूक :

किसान रेल्वे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय झाली आहे. नाशवंत माल जसे डाळींब, सिमला मिरची, केळी, द्राक्षे, पेरू, अननस, पपई, कलिंगड, चिकू, फुलकोबी, लिंबू, हिरव्या मिरची, आईस्ड-फिश, पालेभाज्या, अंडी आणि इतर भाज्याची वाहतूक केली आहे. सर्वांत जास्त वाहतूक द्राक्षेची झाली आहे. द्राक्षे १० हजार ३४८ टन, डाळींब ८५६१ टन व केळी २३९४ टन इतकी वाहतूक झाली आहे.

बॉक्स २

महाराष्ट्रत डाळिंबाचे मोठे उत्पादन :

डाळींब या फळामध्ये प्रभावी पोषक घटक आहेत. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम इत्यादींचा समावेश आहे. महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. राष्ट्रीय बागायती मंडळाच्या मते, डाळिंबाच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ६२.९१ टक्के ईतका आहे.

कोट : किसान रेल्वेला शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे. रेल्वेच्या माध्यमातून शेतकरी आपला माल देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवत आहे. ते देखील जलद. किसान रेल्वेच्या निमित्ताने ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी आता देशाची बाजारपेठ उपलब्ध झाली. शिवाय रेल्वेने शेतमाल पाठविण्यावर शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले आहे.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे विभाग.