शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

राजगुरुनगर बसस्थानक आवारात खड्ड्यांचे साम्राज्य, प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:14 IST

राजगुरुनगर आगार हे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे आगार आहे. या आगारातुन रोज शेकडो बसेसची रोज ये- जा असते. ...

राजगुरुनगर आगार हे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे आगार आहे. या आगारातुन रोज शेकडो बसेसची रोज ये- जा असते. हजारो प्रवाशांची या स्थानकात ये जा सुरू असते. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, कामानिमित्त राजगुरूनगर शहरात येणारे ज्येष्ठ नागरिक यांची विनाकारण या खड्ड्यांमुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एसटी बसेचची सतत वर्दळ असल्यामुळे एसटीचे चाके या खड्ड्यांमध्ये आदळून नागरिक प्रवाशांच्या अंगावर खड्ड्यांतील पाणी उडत आहे.बसस्थानक आवारात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही पायाभूत सुविधा पसल्याने बसस्थानकातील डांबरीकरण उखडून खड्डेच खड्डे पडले आहेत.अतिशय टुमदार अशा या स्थानकात नेहमीच ऐरणीवर येणारा प्रश्न म्हणजे खड्डे. यंदाही आवारात निर्माण झालेल्या खड्ड्यांनी पावसाळ्यात अक्राळ-विक्राळ रूप धारण केले. गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे या खड्ड्यांमुळे मोठे डबके निर्माण झाले आहे. या डबक्यांतून बसेस पुढे नेण्यासाठी बसचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर प्रवाशांनाही या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे या परिसरला डबक्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे एसटी चालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे एसटी बसेस या खड्ड्यांत आदळत आहे. तसेच आवारात येणाऱ्या दुचाकीस्वरांना या खड्ड्यांचा अंदाज येत दुचाकीस्वार घसरून पडत आहे. स्थानक आवारातील खड्डे बुजवावेत पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य ती उपाययोजना राबवावी, अशी मागणी होत आहे.