शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

हलक्या पावसातही खरिपाची पेरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जोराचा पाऊस गायबच झाल्याने हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसातच खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. एकूण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जोराचा पाऊस गायबच झाल्याने हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसातच खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. एकूण क्षेत्राच्या ६५ टक्के पेरण्या झाल्या असून शेतक-यांना जास्तीच्या पावसाची प्रतीक्षा आहे.

सुरुवातीला चांगला बरसलेला पाऊस नंतर गायबच झाला. त्यामुळे पेरण्या लांबल्या. मागील आठवड्यात राज्यात काही ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोकण विभागात काही ठिकाणी तर नाशिक, औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागात तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. कोल्हापूर विभागात बहुतांश ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम पावसाची नोंद झाली.

पावसाची वाट पाहून शेतक-यांनी आहे त्या पावसातच खरीप हंगामाची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील खरिपाच्या एकूण १४१ लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ९१ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे प्रमाण ६४.७७ टक्के आहे. मागील वर्षी याच काळात हे प्रमाण ७६ टक्के होते.

आता भात क्षेत्रात बहुतेक ठिकाणी भात व नाचणी पिकाच्या रोपवाटिका तयार करण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. खाचरे भरली असतील, अशा ठिकाणी लावणीही सुरू झाली आहे. सुरुवातीच्या पावसात भात लावणी केली त्याठिकाणी आता पावसाअभावी रोपे पिवळी पडू लागली आहेत.

पुढील ८ ते १० दिवसांत जोराचा पाऊस न झाल्यास आपत्कालीन नियोजन करावे लागण्याची शक्यता आहे. पेरणी व पिकांच्या पुढील वाढीसाठी आता शेतक-यांना जोराच्या पावसाची आवश्यकता आहे.