शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

वेल्हा पंचायत समिती इमारतीवरून सर्वसाधारण सभेत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:09 IST

लोकतम न्यूज नेटवर्क पुणे : वेल्हे पंचायत समितीच्या इमारतीबाबत गेल्या वर्षभरापासून ठराव करण्याची मागणी करत आहोत. आतापर्यंत चार ...

लोकतम न्यूज नेटवर्क

पुणे : वेल्हे पंचायत समितीच्या इमारतीबाबत गेल्या वर्षभरापासून ठराव करण्याची मागणी करत आहोत. आतापर्यंत चार सभा झाल्या. मात्र, वेल्हे पंचायत समिती इमारतीबाबत अद्यापही तारीख पे तारीख सुरू आहे. आम्ही मोठ्या उदार मनाने यांना मदत केली. मात्र, आमची मुद्दाम अडवणूक केली जात आहे. आतापर्यंत आम्ही सहन केले. मात्र, आता सहन करणार नाही. जर इमारतीचा ठरवा होत नसेल तर अशा सभागृहात राहून तसेच सदस्य राहून काय फायदा ? असे म्हणत कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना धारेवर धरले. यावर उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी उत्तर देत तुमची खासदारांच्या बैठकीत येण्याची तयारी नसते असा आक्रमक पावित्रा घेतला. यावरून उपाध्यक्ष आणि सदस्यांमध्ये बाचाबाची झाली. कॉंग्रेसच्या संतप्त सदस्यांनी राजीनामा देण्याचा इशारा देत सभात्याग केला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी ऑनलाईन पार पडली. या बैठकीला अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबूराव वायकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, गटनेते शरद बुट्टे पाटील, आशा बुचके, देविदास दरेकर तसेच सदस्य उपस्थित होते. कॉंग्रेसचे सदस्य अमोल नलावडे यांनी वेल्हे पंचायत समितीच्या इमारतीचा मुद्दा उपस्थित करत ठराव कधी घेणार, अशी मागणी केली. जागा असताना तसेच तसा ठराव झाला असताना अद्यापही जिल्हा परिषदेने मंजुरी दिली नाही, यामुळे ते आक्रमक झाले. आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत पाठिंबा दिला. इतरही विषयात महाविकास आघाडीचा घटक म्हूणन आम्ही सोबत असतो. मग आमच्या हक्काच्या इमारतीच्या प्रश्नावर आमची अडवणूक का, असे म्हणत अमोल नलावडे व कॉंग्रेसचे सदस्य आक्रमक झाले. या वेळी उपाध्यक्ष रणजित शिवतरेही आक्रमक झाल्याने कॉंग्रेस सदस्य आणि शिवतरे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. शिवतरे म्हणाले की, आम्ही वारंवार बैठका घेतल्या. खासदारांसोबतही आम्ही बैठकीचे नियोजन केले. मात्र, तुम्हाला त्यांच्या सोबत बसायचे नसते. यावर अमोल नलावडे म्हणाले की, आम्ही या संदर्भात पालकमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यांनी मंजुरी दिली असतानाही ठराव का होत नाही, असे म्हणत आक्रमक भूमिका घेतली. गेल्या सर्वसाधारण सभेतही याच मुद्यावरून कॉंग्रेस गटनेत्यांनी सभात्याग केला होता. याही बैठकीत जर आमची मागणी मान्य होत नसेल, सदस्यांचे प्रश्न सुटत नसतीत त्या सभागृहात राहून काय उपयोग, असे म्हणत कॉंग्रेसच्या सर्वांनी सभात्याग केला.