शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

केळवडे- उर्से रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी रक्तदान आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:10 IST

-- नसरापूर : पुणे रिंग रोडच्या पश्चिम विभागात येणाऱ्या केळवडे ते उर्से रस्त्यास भोर तालुक्यातील केळवडे येथील शेतकऱ्यांनी रिंग ...

--

नसरापूर : पुणे रिंग रोडच्या पश्चिम विभागात येणाऱ्या केळवडे ते उर्से रस्त्यास भोर तालुक्यातील केळवडे येथील शेतकऱ्यांनी रिंग रोडला विरोध केला आहे. शासनाकडून जमीन संपादन व मोजणीचे कामकाज सुरू असून त्यास शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्यानंतर सुध्दा आम्ही करत असलेल्या विरोधास जुमानले जात नाही. त्यासाठी शासन करत असलेल्या शोषणास विरोध दर्शविण्यासाठी रक्तदान आंदोलन करणार असल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले.

वास्तविक भोर तालुक्यातील केळवडे, कांजळे, खोपी, राजे, कुसगाव आदी गावातून रिंग रोड जात असल्याबाबत आम्हा गावकऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांनी अंधारात ठेवले मात्र प्रिंट मीडियामुळे या भागातून रोड जात असल्याचे आम्हाला प्रथम कळाले होते. त्यानुसार आम्ही शासनाकडे शासनाने कळविण्याच्या आतच आमच्या हरकती शासन दरबारी नोंदविल्या आहेत. वृत्तपत्रांमधून माहिती मिळाल्यावर सर्व शेतकऱ्यांनी याबाबत प्रांत अधिकारी यांच्याकडे रीतसर हरकती दिल्या आहेत. त्यावेळी गावपातळीवर सर्वांसमक्ष सार्वजनिक चर्चा होऊन हरकतींचे निवारण करणार असल्याचे प्रांतांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात कोरोनाचे कारण पुढे करुन प्रांत कार्यालयात शेतकऱ्यांना बोलावून हरकतींची सखोल चर्चा करण्याच्या ऐवजी तुमचे म्हणणे शासनाला कळवू असे सांगून परत पाठवले गेले आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शासनाने भोर व वेल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी तालुक्यातील तीन धरणे, कालवे, महामार्ग, आदी प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या आहेत. त्या बाधित शेतकऱ्यांचे अद्यापही १०० टक्के पुनर्वसन झाले नाही,तरी पुन्हा रिंग रोडचे भूत आमच्या मानगुटीवर बसवलेले आहे अशी खंत यावेळी काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

--

ज्या जमिनीतील प्रयोगावर राष्ट्रपती पुरस्कार त्या जमिनी रोडसाठी घेण्याचा घाट

--

भोर तालुक्यातून जात असलेला रिंगरोड रस्ता हा पडीक व माळरान भागातून न जाता पूर्ण पाने सुपिक व बागायती क्षेत्रामधून जात आहे. येथील जमिनीत वर्षावर्षे पिढ्यानपिढ्या जमीन सुपिक होण्यासाठी झटल्या आहेत. त्यामुळे आता कुठेतरी या जमिनीमधून अत्यंत चांगल्या प्रकारे शेतीतून उत्पन्न मिळू लागल्याने आम्ही शेतकरी नोकरीच्या मागे न लागता आमचे शेती हेच उपजीविकेचे साधन आहे.त्यामुळे फळबाग, पॉली हाऊस, विहिरी ,पोल्ट्रीशेड उभ्या राहिल्या आहेत. त्यातूनच अनेक शेतकऱ्यांना शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून आपले राष्ट्रपती यांच्यापासून पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळें आम्ही उदरनिर्वाहाचे साधन शासनाने मागितले आणि क्षणात शासनाला शेती दिली असे होऊ शकतच नाही. आमच्या जमिनी गेल्यातर येथील ९० टक्के शेतकरी भूमिहीन होणार आहेत तर ५० टक्के शेतकरी बेघर होऊन रस्त्यावर येणार आहेत.