शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

‘कळमोडीचे’ही पाणी रोखले!

By admin | Updated: November 11, 2015 01:44 IST

भामा आसखेडमधून सोडण्यात येणारे पाणी सर्वपक्षीयांनी सोमवारी रोखल्यानंतर मंगळवारी कळमोडी धरणातून गेल्या तीन-चार दिवसांपसून होणारा विसर्ग तेथील ग्रामस्थांनी बंद केला

चासकमान : भामा आसखेडमधून सोडण्यात येणारे पाणी सर्वपक्षीयांनी सोमवारी रोखल्यानंतर मंगळवारी कळमोडी धरणातून गेल्या तीन-चार दिवसांपसून होणारा विसर्ग तेथील ग्रामस्थांनी बंद केला. विनंती करूनही अधिकारी मानत नसल्याने त्यांनी धरणावरून जाऊन व्हॉल्व्ह बंद केला.७ नोव्हेंबर रोजी धरण प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांना पूर्व कल्पना न देताच कळमोडी धरणातून १९४ क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात केली. यावर ग्रामस्थांनी धरण अधिकाऱ्याला पाणी बंद करण्याची विनंती केली. परंतु, विनंती करूनही पाणी बंद न केल्यामुळे कळमोडी, चिखलगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. कळमोडी धरणाचे शाखा अभियंता बारवे यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता ग्रामस्थांनी पाणी बंद केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ग्रामस्थांबरोबर चर्चा करून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असे सांगितले.येथील सर्व ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय दूध धंदा आहे. पाणीच जर शिल्लक राहिले नाही, तर मुक्या जनावारांच्या पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यांनी काय मरायचे काय? असा सवाल ग्रामस्थांनी केला. लक्ष्मणराव मुके, बाळासाहेब गोपाळे, सदाशिव शेलार, गणपत गोपाळे, काशीनाथ गोपाळे, बाळशीराम गोपाळे, प्रभाकर गोपाळे यांसह दीडशे ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)1उन्हाळा अखेरीस दर वर्षी या धरणातून पाणी सोडले जायचे. मग या वर्षीच लवकर पाणी सोडण्याची बुद्धी का सुचली? हा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. आमच्या जमिनी पाण्यात गेल्या, त्याचा मोबदला अजून आम्हाला मिळाला नाही. आता आमच्या हक्काचे पाणी आहे, ते पळवा व आम्हाला उपाशी मारा, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.