शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कळमोडी धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:07 IST

लोकमत नूज नेटवर्क राजगुरूनगर: खेड तालुक्यातील पश्चिम भागातील १.५ टीएमसी साठवण क्षमता असणारे कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले ...

लोकमत नूज नेटवर्क

राजगुरूनगर: खेड तालुक्यातील पश्चिम भागातील १.५ टीएमसी साठवण क्षमता असणारे कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातून आरळा नदीत तीन हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून घाटमाध्यावर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. खेड तालुक्यात कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील खरपूड, परसूल, भोमाळे, घोटवडी परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे धरण भरण्यात मोठी मदत झाली आहे. पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. यामुळे चासकमान धरणातील पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होणार आहे. चासकमान धरणातही १ टीमसीने वाढ झाली आहे. भामा आसखेड धरणही ५० टक्के भरले आहे. आराळा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या लोकांनी नदीपात्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनानी दिली आहे.

चौकट

दरवाजा विरहित असलेल्या या धरणाच्या सांडव्यावरून सध्या तीन हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाणी आरळा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १.५ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे. आरळा नदीत सोडलेल्या पाण्याचा चासकमान धरणात संचय होतो. गेल्या तीन दिवसांपासून चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विशेषतः भीमाशंकर, भोरगिरी, कारकुडी, मंदोशी, कुडे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चासकमान धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे.

फोटो : कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून तीन हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.