शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

कळंबोली पुलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:21 IST

वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास दुर्घटनेची शक्यता: दुरुस्तीची मागणी वालचंदनगर : गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे व धरणातून पाणी ...

वाहनचालकांचा

जीव मुठीत घेऊन प्रवास

दुर्घटनेची शक्यता: दुरुस्तीची मागणी

वालचंदनगर : गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे व धरणातून पाणी विसर्ग केल्यामुळे निरा नदीला महापूर आला.यामध्ये पुणे-सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा कळंबोलीच्या पुलाचा संरक्षक कठडा तुटून वाहून गेला आहे. यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना अक्षरश: जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कठड्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

गेल्या महिन्यात इंदापूर तालुक्यात अक्षरश: ढगफुटी झाली होती. यात भर की काय म्हणून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून निरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी विसर्ग करण्यात आला.यामध्ये कळंब गावातील निरा नदीकाठच्या परिसरातील २००घरे पाण्यात गेली होती. अनेक कुटुंबांना स्थलांतर होण्याची वेळ आली होती.बी के बी एन रस्त्याची वाहतुकव्यवस्था ठप्प झाली होती.कळंबहुन कळंबोलीच्या पुलावरून सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते शहराकडे नियमित होणारी वाहतूक दोन दिवस बंद करण्यात आली होती.निरा नदीमधील पाण्याच्या कमालीच्या प्रवाहामुळे निरा नदीवरील लोखंडी संरक्षक कठडा अक्षरश: वाहून गेला आहे.

हा पूल वाहतुकीसाठी मुख्य मार्ग असल्याने या पुलावरून दररोज हजारोंच्या संख्येने चारचाकी आणि दुचाकी वाहने ये जा करीत असतात.वाहतूकीच्या दृष्टीने महत्वाच्या पुलाच्या मार्गावरील लोखंडी संरक्षक कठडे बसवावेत अशी मागणी प्रवाशीवगार्तून होत आहे. काही दिवसांपूर्वी याच पुलावरून संरक्षक कठडे नसल्याने अंथुर्णे येथील सहा जण तर त्यानंतर जंक्शन येथील एका युवकाचा बळी गेला आहे.शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ ठोस उपाययोजना करावी अशी प्रवाश्यांची मागणी आहे.

————————————————

फोटो ओळी : निरा नदीवरील कळंबोलीच्या पुलाचा संरक्षक कठडा तुटल्यामुळे प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

०२१२२०२०-बारामती-०४

——————————————

===Photopath===

021220\02pun_1_02122020_6.jpg

===Caption===

निरा नदीवरील कळंबोलीच्या पुलाचा संरक्षक कठडा तुटल्यामुळे प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.