शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जुन्नरच्या ३३ क्रांतिकारकांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खोडद : भारताच्या इतिहासात स्वातंत्र्यलढा महत्वपूर्ण आहे. अनेकांनी स्वतंत्र भारताच्या स्वप्नासाठी प्राणाची आहुती दिली, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खोडद : भारताच्या इतिहासात स्वातंत्र्यलढा महत्वपूर्ण आहे. अनेकांनी स्वतंत्र भारताच्या स्वप्नासाठी प्राणाची आहुती दिली, तर अनेक जणांनी तुरुंगवास भोगला. त्यांच्या या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत. या स्वातंत्र्य लढ्यात जुन्नर तालुक्यातील ३३ क्रांतिकारकांनी सक्रिय सहभाग घेतला असून, त्यांचे अतुलनीय योगदान राहिले आहे. त्यांचे हे कार्य जुन्नरसाठी गौरवशाली बाब आहे. या ३३ क्रांतिकारकांचा, त्यांनी केलेल्या कार्याचा एकत्रित संग्रह करून त्यांचे जतन केले जाणार आहे.

नारायणगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे प्रा. डाॅ. लहू गायकवाड आणि प्रा. डॉ. नवनाथ वाजगे यांनी विशेष प्रयत्न करून हा संग्रह तयार केला आहे. तालुक्यातील जुन्या पिढीतील लोकांसोबत संवाद साधून ऐतिहासिक कागदपत्रे गोळा करून एकत्रित असा ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीत जुन्नर तालुक्याचे योगदान’ म्हणून पुस्तकरुपात भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी प्रकाशित होणार आहे.

जुन्नर प्रांतात महादेव कोळी आदिवासी समाज पूर्वापार या भागातील डोंगरी गड-किल्ल्यांचे रक्षण आणि देखभाल करीत आला आहे. यामध्ये अगदी मुगल काळापर्यंत कोणतीही ढवळाढवळ केंद्रीय सत्तांनी केली नव्हती. ब्रिटिश कालखंडात १८१८ मध्ये या गडकोटांच्या पायऱ्या, तटबंदी आणि बुरूज सुरुंगाने उडवून दिले. यामुळे या सर्व समाज बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आणि हे बंड करून लढण्यासाठी सज्ज झाले. याचा परिणाम म्हणून १८३० मध्ये जुन्नर परिसरात ब्रिटिशांविरोधात मोठे बंड पेटले. या बंडाचे नेतृत्व रामचंद्र गोरे, भाऊ खरे, चिमणाजी जाधव, नाना दरबारे इत्यादी मंडळींनी केल्याच्या नोंदी सापडतात. यापैकी रामचंद्र गोरे यांना ब्रिटिश सरकारने फासावर चढविले आणि त्यांच्या ५४ सहकाऱ्यांना आजन्म कारावासाची शिक्षा दिली. तरीही हे बंड मोडून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारला पुढील २० वर्षे प्रयत्न करावे लागले. १९२० ते १९३० या कालावधीत कोंडाजी नवले या आदिवासी क्रांतिकारकाने ब्रिटिश सरकारला आणि स्थानिक सावकारांना पुरते जेरीस आणले होते. त्यांना पिलाजी बोराडे, लव्हाजी बोराडे, अनाजी साबळे, गणा आंबकर, गणपत बोराडे यांनी साथ दिली. कोंडाजी नवलेला पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने स्थानिकांना विविध प्रलोभने दाखवणे, दडपशाही करणे, स्वतंत्र पोलीस पथकाच्या नियुक्त्या करणे, प्रसंगी बक्षिसे जाहीर करणे, धाडी टाकणे असे विविध प्रकार करुन पाहिले. परंतु स्थानिकांच्या पाठिंब्यावर आणि सह्याद्रीतील कडेकपारीच्या साथीने कोंडाजी नवले हा सावकारांना जेरीस आणत राहिला. या क्रांतिकारकाने सामान्य नागरिकांना कधीच त्रास दिला नाही. कोंडाजी नवलेच्या मागावर पुढे मे १९४० मध्ये डीएसपी हायलँड यांना जुन्नरला पाठविण्यात आले. त्याने जुन्नरच्या डोंगरकपारीत, दौंड्या डोंगरात, कधी घनदाट जंगलात, तर कधी आडरानाच्या गावात लपून असलेल्या कोंडाजी नवलेला शोधण्याचे खूपच प्रयत्न केले. अखेर जुलै १९४० मध्ये पोलीस चकमकीत अखेर कोंडाजी ठार झाले.

चौकट

जुन्नर या शिवजन्मभूमीतून मोठ्या प्रमाणात भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पाठबळ देण्यात आले. मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, ओतूरचे साराबंदी आंदोलन, आदिवासींच्या न्याय्य-हक्कासाठी उभारलेले सशस्त्र लढे, भूमिगत क्रांतिकारकांचे कार्य, ओतूर येथील मुलींची शाळा उभारणी, जुन्नर कोर्टातील ऐतिहासिक खटला, खादी आणि स्वदेशीचा प्रसार, नाटक कंपन्यांच्या माध्यमातून जनजागृती, शाहीर आणि तमाशा कलेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचून स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी जुन्नर तालुका अग्रभागी होता हेच अधोरेखित होते.

प्रा. डॉ. लहू कचरू गायकवाड, इतिहास लेखक व अभ्यासक, नारायणगाव

130821\0304picsart_08-13-02.35.16.jpg

डॉ.लहू गायकवाड यांनी लिहिलेले स्वतंत्र लढ्यातील जुन्नर तालुक्याचे योगदान हे पुस्तक