शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

महिला सक्षमीकरणाचा जागर

By admin | Updated: June 12, 2017 01:30 IST

पिंपरी जगाच्या कल्याणा संतांची विभुती, असे वचन सर्वज्ञात आहे. अखिल मानवाचे कल्याणासाठी संतांनी जीवन समर्पिले.

विश्वास मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी जगाच्या कल्याणा संतांची विभुती, असे वचन सर्वज्ञात आहे. अखिल मानवाचे कल्याणासाठी संतांनी जीवन समर्पिले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे वैभव असणारा आषाढीवारी सोहळा आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात फेसबुक दिंडीच्या निमित्ताने माणसाचे जगणे, जीवन समृद्ध करणारी, समाजभान देणारी तरुणांची वारी सहभागी होणार आहे. या उपक्रमात स्वप्निल मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर, ओंकार महामुनी हे तरुण सहभागी झाले आहेत. तरुण महिला सक्षमीकरणावर प्रबोधन करणार आहेत. स्वप्निल मोरे म्हणाले, ‘‘पंढरीची वारी म्हणजे विठ्ठलाला भेटण्याची वारकऱ्यांची आस, पंढरपूरपर्यंत केलेला संघर्षमय प्रवास. साधारणपणे पंढरीची वारी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त केली जाते. माझे आजोबा वारीमध्ये जात होते, त्यांच्या शरीराने साथ द्यायचे सोडल्यानंतर माझ्या वडिलांनी पंढरीची वारी सुरू केली. काही काळानंतर तीच वारी माझ्याकडेही येणार आहे. याच प्रकारे वारीचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर होते. या भावनेतून आम्ही तरुण काम करीत आहोत. वारीबद्दल अनेक गैरसमज आहेत. वारी हे जीवन समृद्ध करणारी आहे. जीवन घडविण्याची आणि मार्ग दाखविण्याचीही आहे. यंदाची वारी तीची आहे. वारी तिच्या अभिव्यक्तीची, वारी तिच्या जाणिवांची, वारी तिच्या संघर्षाची, वारी तिच्या अस्तित्वाची, वारी तिच्या मुक्तीची, वारी तिच्या स्त्रीत्वाची अर्थात तीची वारी आहे. अभियानातून फेसबुक दिंडी ती आणि तिचा संघर्ष मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.’’ जलसंधारण अभियानांतर्गत मौजे बऱ्हाणपूर आणि मौजे कारखेल ता. बारामती या दोन गावांमध्ये ओढा खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे करण्यात आली. तसेच यावर्षी तरुणांनी महिला सक्षमीकरण, सबलीकरणावर भर दिला आहे. तीची वारी उपक्रम राबविण्यात येणार आहे. वारी कथा आहे एका संघर्षाची, वारी गाथा आहे अस्तित्वाची, वारी प्रवास आहे अंतरंगाचा, वारी कहाणी आहे स्वत्वाची. गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्या, बाल लैंगिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, मासिक पाळी समज गैरसमज, बालविवाह, हुंडा, कौटुंबिक हिंसाचार, विधवांच्या समस्या, रूढी आणि परंपरांमध्ये अडकलेल्या स्त्रिया, वारकरी संप्रदायातील स्त्री संतांचे कार्य, स्त्री अभिव्यक्ती, कर्तृत्ववान स्त्रिया याविषयी प्रबोधन केले जाणार आहे. फेसबुक दिंडीचा सामाजिक प्रबोधनावर भरपंढरीत विठुरायाच्या चरणी एकरूप होण्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराममहाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळा देहू व आळंदीतून मार्गस्थ होणार आहे. हा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने महाराष्ट्राला वारीची आस लागली आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात महाराष्ट्राचा वैभवी सोहळा सातासमुद्रापार अनुभवता यावा, यासाठी संतश्रेष्ठ तुकोबारांच्या वंशपरंपरेतील स्वप्निल मोरे या तरुणाने केला असून गेल्या सात वर्षांपासून फेसबुक दिंडी उपक्रम राबविण्यात येतो.महाराष्ट्रातील वैभव सोहळ्याचे दर्शन इंटरनेटच्या माध्यमातून अखिल विश्वाला घडविण्याचा प्रयत्न केला आहे. पालखी सोहळ्यातील, वारीची वाट, त्याची छायाचित्रे, व्हिडिओ अपलोड केले जातात. वारीचे यथार्थ दर्शन घडविले जाते. वारी हे केवळ आध्यात्मिक नसून सामाजिक भान देणारी आहे. यासाठी फेसबुक दिंडीने प्रयत्न केले आहेत. तसेच सामाजिक भानही जपले आहे.