शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

रक्त सांडले तरी चालेल; पण जमीन देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : रक्त सांडले तरी चालेल पण रिंगरोड आणि रेल्वेसाठी इंचभर ही जमीन देणार नाही, असा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकण : रक्त सांडले तरी चालेल पण रिंगरोड आणि रेल्वेसाठी इंचभर ही जमीन देणार नाही, असा पवित्रा घेऊन भूसंपादनाला आपला विरोध कायम असल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी माजी खासदार तथा उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले.

खेड तालुक्यातील बारा गावांमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा रिंगरोड आणि रेल्वेसाठी जमीन देण्याचा विरोध कायम असल्याचे स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासकीय अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, जि. प. सदस्य बाबाजी काळे, सहसंपर्कप्रमुख अशोक खांडेभराड, प्रकाश वाडेकर, माजी जि. प. सदस्य किरण मांजरे यांच्यासह रिंगरोड, रेल्वे प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

खेड तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली, धानोरे, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या गावांचा त्यात समावेश आहे. रेल्वे प्रकल्पाच्या मार्गासाठी ५० ते ८० मीटर आणि रिंगरोडसाठी सऱ्हासपणे ११० मीटर अशी एकूण ५८६ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. ही सर्व गावे भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या जवळ वसलेली आहेत. येथील शेतकऱ्यांना कमी प्रमाणात शेतजमिनी आहे. बऱ्यापैकी जमीन बागायत असल्यामुळे येथील शेतकरी यावर उदारनिर्वाह करतात. या दोन्ही प्रकल्पांना जमीन संपादन झाल्यास अनेक शेतकरी भूमिहीन तर काही अल्पभूधारक होणार आहेत. त्यामुळे इंचभर ही जमीन देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. याच गावांमध्ये असलेल्या शेकडो एकर शासकीय गायरान जमिनीवर हे प्रकल्प राबविले जावेत, अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

रिंगरोड आणि रेल्वे प्रकल्पाला माझा विरोध नाही. मात्र शेतकऱ्यांना देशोधडीला लावून प्रकल्प उभारण्यात येणार असतील तर आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान कसे होईल याकडे पाहून दोन्ही प्रकल्प पूर्ण करावे, असे शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. यावेळी नितीन गोरे यांनीही शिवसेना शेतकऱ्यांच्यासोबत असल्याचे सांगितले.

फोटो - चाकण येथे रिंगरोड आणि रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी व अधिकारी बैठक.