शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जात-धर्म-भाषेच्या पलीकडे जाऊन एकत्र येणे महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:11 IST

पुणे : आजच्या काळात जात, धर्म, भाषा या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एकत्र येणं हे महत्वाचं आहे. भारताकडे जगाचं आध्यात्मिक ...

पुणे : आजच्या काळात जात, धर्म, भाषा या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एकत्र येणं हे महत्वाचं आहे. भारताकडे जगाचं आध्यात्मिक नेतृत्व करण्याची क्षमता आहे. बहुलवादी संस्कृती हीच भारताची ताकद आहे, असे मत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केले.

स्वर्गीय माधवी मोहनदास नवलाखा स्मृती प्रतिष्ठान आणि पुणे युथ अँड सोशल फाऊंडेशन आयोजित वीरचंद गांधी ट्रॉफी इंटर सोसायटी क्रिकेट टुर्नामेंटचे मुकुंदनगर येथे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन कृष्णप्रकाश यांच्या हस्ते झाले. यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, महाराष्ट्र ऑलिंपिक्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, स्व. माधवी मोहनदास नवलाखा फाऊंडेशनचे नीलेश नवलाखा, पुणे युथ अँड सोशल फाऊंडेशनच्या श्वेता होनराव-कामठे आदी मान्यवर उपस्थित होते.

कृष्णप्रकाश म्हणाले, वीरचंद गांधी यांच्या तात्विक मांडणीने भारताचा आध्यात्मिक धागा पुढं नेण्यात बळ मिळाले. स्पर्धेतून नेमकं हेच घडतं. अशा खिलाडू वृत्तीमुळे राज्य, देश आणि मानवता उंचीवर जाऊ शकते.

इंटर सोसायटी क्रिकेट टुर्नामेंट २८ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असून त्यात विविध संघ सहभागी झाले आहेत. सोसायटीतील नागरिकांमध्ये खेळाच्या निमित्ताने एकजूट व्हावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे नीलेश नवलाखा यांनी प्रास्ताविकात सांगितले. श्वेता होनराव यांनी मनोगत व्यक्त केले.