शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

शेतकरी आत्महत्येवर ‘इरमा’चा डोस

By admin | Updated: April 28, 2017 06:02 IST

कायदा हा कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने राहिला नसल्याने, हा व्यवसाय नेहमीच आतबट्ट्याचा ठरला आहे. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव

पुणे : कायदा हा कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने राहिला नसल्याने, हा व्यवसाय नेहमीच आतबट्ट्याचा ठरला आहे. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, सावकारीसह संपूर्ण कर्जमुक्ती आणि सर्व प्रकारच्या संकटातून संरक्षण देणारा इन्कम रिस्क मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (इरमा) लागू केल्यास मी गॅरंटीने सांगतो राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबतील, असा विश्वास कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. मुळीक यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांची ग्रंथतुला करून आणि शिंदेशाही पगडी, ७५ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. त्यांची पत्नी शालिनी यांचाही साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. या प्रसंगी त्यांनी शेतीच्या स्थितीवर आणि सरकारी धोरणांवर परखड टिप्पणी केली. पालकमंत्री गिरीश बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, आमदार जगदीश मुळीक, उल्हास पाटील, पाशा पटेल, मोहन जोशी, उल्हास पवार, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, उत्तमराव शिंदे-सरकार या वेळी उपस्थित होते. डॉ. मुळीक म्हणाले, ‘‘सरकारने सावकारीसह संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे. तशी घोषणा करण्याचे धाडस सरकारने दाखविले पाहिजे. शेतमालाला भाव नाही आणि शेतीला धोरणाप्रमाणे कर्ज वितरण नाही, असे दुष्टचक्र आहे. कायद्यानेच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला असता, तर आज तुरीचा प्रश्न उपस्थित राहिला नसता.’’ शेतकऱ्यांना नैसर्गिक, कृत्रिम अशा सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण दिल्यास कोणीही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यासाठी मी इन्कम रिस्क मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (इरमा) लागू करण्याचा आग्रह सरकारकडे धरीत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)