शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

शेतकरी आत्महत्येवर ‘इरमा’चा डोस

By admin | Updated: April 28, 2017 06:02 IST

कायदा हा कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने राहिला नसल्याने, हा व्यवसाय नेहमीच आतबट्ट्याचा ठरला आहे. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव

पुणे : कायदा हा कधीही शेतकऱ्यांच्या बाजूने राहिला नसल्याने, हा व्यवसाय नेहमीच आतबट्ट्याचा ठरला आहे. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, सावकारीसह संपूर्ण कर्जमुक्ती आणि सर्व प्रकारच्या संकटातून संरक्षण देणारा इन्कम रिस्क मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (इरमा) लागू केल्यास मी गॅरंटीने सांगतो राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबतील, असा विश्वास कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. मुळीक यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांची ग्रंथतुला करून आणि शिंदेशाही पगडी, ७५ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. त्यांची पत्नी शालिनी यांचाही साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. या प्रसंगी त्यांनी शेतीच्या स्थितीवर आणि सरकारी धोरणांवर परखड टिप्पणी केली. पालकमंत्री गिरीश बापट, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, आमदार जगदीश मुळीक, उल्हास पाटील, पाशा पटेल, मोहन जोशी, उल्हास पवार, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, उत्तमराव शिंदे-सरकार या वेळी उपस्थित होते. डॉ. मुळीक म्हणाले, ‘‘सरकारने सावकारीसह संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे. तशी घोषणा करण्याचे धाडस सरकारने दाखविले पाहिजे. शेतमालाला भाव नाही आणि शेतीला धोरणाप्रमाणे कर्ज वितरण नाही, असे दुष्टचक्र आहे. कायद्यानेच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला असता, तर आज तुरीचा प्रश्न उपस्थित राहिला नसता.’’ शेतकऱ्यांना नैसर्गिक, कृत्रिम अशा सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण दिल्यास कोणीही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यासाठी मी इन्कम रिस्क मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (इरमा) लागू करण्याचा आग्रह सरकारकडे धरीत आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)