शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

कोरोनाने घेतली आयपीएलची विकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:18 IST

वास्तविक ही चर्चा केवळ भावनिक आहे. कोरोना विषाणूमुळे अडखळलेल्या अर्थचक्राला मंद का होईना, पण वेग देण्याचे काम आयपीएल क्रिकेटमुळे ...

वास्तविक ही चर्चा केवळ भावनिक आहे. कोरोना विषाणूमुळे अडखळलेल्या अर्थचक्राला मंद का होईना, पण वेग देण्याचे काम आयपीएल क्रिकेटमुळे होत होते. रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना सामने खेळले जात असल्याने कोरोना साथ पसरण्याचा धोका संपला होता. दररोज संध्याकाळी रंगणाऱ्या थराराचा आनंद लुटण्यासाठी का होईना लाखो क्रिकेटप्रेमी घरी थांबू लागले हाही एक अप्रत्यक्ष फायदाच होता. आयपीएल खेळणाऱ्या प्रत्येक संघाला 'बायो-बबल'चे नियम अनिवार्य केल्याने तर चार रोजगार वाढलेच, पण कमी झाले नाहीत. एकूणात काय तर आयपीएल क्रिकेटमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे काही कुठे दिसले नाही. आठ देशांमधले खेळाडू एकत्र करत, 'बायो-बबल'चे नियम पाळत सामने खेळवणे ही कोरोना संकटकाळात फार कठीण कामगिरी होती. खेळाडूंच्या मानसिकतेचीही कसोटी यात पाहिली गेली. नातेवाईक, मित्रपरिवाराला कोरोनाचा धोका असताना क्रिकेटच्या मैदानावर उतरणारा प्रत्येक खेळाडू सर्वोच्च कामगिरीसाठी घाम गाळत होता. दुसऱ्या बाजूला कोणतेही व्यवहार्य, तर्कशुद्ध कारण न देता आयपीएलच्या नावाने खडे फोडले जात होते. तरीही बीसीसीआयने नेटाने स्पर्धा चालू ठेवली. फक्त क्रिकेटच कशाला पुण्यासारख्या शहरात आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धाही कोरोनाच्या काळातच खेळल्या गेल्या. पण, क्रिकेटएवढे ग्लॅमर त्याला नसल्याने बहुधा त्यावर कोणी टीका केली नाही. शेवटी कोरोनानेच आयपीएल थांबवली. खेळाडूंनाच कोरोनाने गाठल्याने बीसीसीआय पुढचे पर्याय संपले.

आयपीएलसारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या स्पर्धेचे नियोजन एका रात्रीत होत नसते. हे नियोजन झाले तेव्हा केंद्रातले, राज्यातले सरकार आणि बव्हंशी जनतादेखील कोरोनाचे संकट संपत आल्याच्या भ्रमात होती. याला बीसीसीआयदेखील अपवाद नव्हती, तरी बीसीसीआयने सहाच शहरांत सामने खेळवण्याचा सुज्ञपणा दाखवला. स्पर्धेतील संघांसाठी काटेकोर नियमावली केली. चेन्नई, मुंबईत पहिल्या टप्प्यातले सामने झाले. सध्या दुसऱ्या टप्प्यातले सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळले जात होते. तिसऱ्या टप्प्यातले सामने येत्या आठवड्यात बंगळुरू आणि कोलकात्यात होणार होते. रंगतदार होत गेलेली आयपीएल अंतिम टप्प्याकडे जात असतानाच कोरोनाने 'बायो-बबल' फोडल्याचे स्पष्ट झाले. यात फार काही अघटीत घडले असे नाही. कोरोना संसर्गाची तीव्रता लक्षात घेता हे कधी ना कधी घडू शकते, अशी धास्ती होती. नेमके तेच घडले. कोरोनाने आपल्यातल्या अनेकांना अकाली हिरावून नेले. कोणाचाही मृत्यू हा दुःखद आणि नकोसाच असतो. क्रिकेटप्रेमींना, खेळाडूंना, आयोजकांची भावना या बाबतीत वेगळी असेल असे मानणे त्यांच्यावर अन्याय करणारी ठरेल. आसपास लोक आजारी पडत आहेत. उद्योगधंदे बंद पडल्याने, पगार कमी झाल्याने, नोकऱ्यांवर टांगती तलवार आल्याने आर्थिक-सामाजिक विवंचनेत अनेकजण आहेत. त्यातच कोरोना कधी कोणाला, गाठेल याचा नेम नसल्याचा ताण वेगळाच. पण म्हणून कोणी जगणे थांबवते काय़? संवदेनशीलता कायम ठेवून आहे ते जगणे आनंदी करत पुढे चालण्याचे तारतम्य दाखवावे लागते. क्रिकेट काय किंवा अन्य कला, क्रीडाप्रकार, वाचनासारखे छंद काय, कोरोनाकाळात यातून मिळेल तितके बळ घ्यावे. सकारात्मक ऊर्जा घ्यावी. 'मरे येक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे,' हे शाश्वत सत्य तर आहेच की. उन्माद टाळून, आनंद वाटत राहिले तरच सध्याचे दिवस सोपे होतील. क्रिकेटच्या माध्यमातून हे घडत होते. ते थांबले.