शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

पुणे-नगर रस्ता दळणवळणासाठी व्यत्यय

By admin | Updated: October 14, 2015 03:26 IST

औद्योगिकीकरण तसेच दळणवळणाची सुव्यवस्था विकासाच्या धमण्या समजल्या जातात. तालुक्यात औद्योगिकीकरणाचे जाळे विणले गेले.

प्रवीण गायकवाड, शिरूरऔद्योगिकीकरण तसेच दळणवळणाची सुव्यवस्था विकासाच्या धमण्या समजल्या जातात. तालुक्यात औद्योगिकीकरणाचे जाळे विणले गेले. मात्र, या वाढत्या औद्योगिकीकरणासाठी दळणवळणाचे साधन असलेला पुणे-नगर रस्ता दळणवळणासाठी व्यत्यय बनू लागला आहे. याचा परिणाम नवीन उद्योग तालुक्यात येण्यास तयार नाहीत, तर आहे ते उद्योग स्थलांतराच्या विचारात असल्याचे चित्र आहे. २००० साली रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीची सुरुवात करण्यात आली. पंचतारांकित दर्जा असलेल्या या वसाहतीत मोठ्या प्रमाणावर बहुराष्ट्रीय कारखान्यांचे जाळे विखुरले आहे. या वसाहतीमुळे शासनाने दळणवळण सुरळीत होण्याकरिता शिरूर-पुणे या रस्त्याचे चौपदरीकरणाचे कामही केले. हा रस्ता तयार करताना शासनाने अनेक त्रुटी ठेवल्या, असे आता जाणवते. विदर्भ-मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या या रस्त्यावर दिवसागणिक वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रस्ता तयार करणे गरजेचे होते. तसेच या रस्त्यावर असणाऱ्या गावांच्या ठिकाणी उड्डाणपुलाची सुविधा निर्माण करणेही आवश्यक होते. मात्र, केवळ चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. अनेक ठिकाणी रस्त्याच्या रुंदीचे निकष पाळण्यात आले नाही. २००५ ते २०१४ पर्यंत या रस्त्यावर पेरणे फाटा (२०१० पर्यंत रांजणगाव येथेही) येथे टोलनाका होता. या नाक्यावरील ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागायच्या, हाही एक मोठा अडथळा होता. संध्याकाळी घरीही वेळेवर पोहोचता येत नाही. यामुळे हा अधिकारीवर्ग तसेच इतर कर्मचारीही त्रासलेले आहे. असहाय असल्याप्रमाणे ते हे सर्व सहन करीत आहेत.