शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

...हा संस्था बंद पाडण्याचा डाव

By admin | Updated: July 25, 2015 04:14 IST

एफटीआयआयमधील ‘महाभारता’ला आता वेगळेच वळण लागले आहे. ज्या संस्थेपासून राजकीय शक्ती दूर ठेवण्याच्या बाता मारल्या जात होत्या,

पुणे : एफटीआयआयमधील ‘महाभारता’ला आता वेगळेच वळण लागले आहे. ज्या संस्थेपासून राजकीय शक्ती दूर ठेवण्याच्या बाता मारल्या जात होत्या, त्या संस्थेमध्येच आता विद्यार्थ्यांच्या विरोधातले राजकारण सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांवर दाखल झालेला गुन्हा, संस्थेमध्ये मुले अमली पदार्थ घेत असल्याने पोलिसांची त्यांच्यावर असलेली करडी नजर आणि यातच आता पतितपावन संघटनेने या मुलांना अटक करण्यासाठी काढलेला मोर्चा या गोष्टींमधून विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचे प्रकार आता सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन किती काळ तग धरणार हाच कळीचा मुद्दा आहे. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलनाचे ४२ दिवस सरले तरी केंद्र शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. मात्र हे आंदोलन संपवण्याचे प्रकार या ना त्या मार्गाने सुरू झाले आहेत. या साऱ्या गोष्टी संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या आहेत, असे सांगत हा विरोधी विचारांच्या व्यक्तींचा संस्था बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच विरोधक आंदोलनाला मूळ मुद्द्यांपासून हटवून वेगळे वळण लावत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, चांदेकर यांनी संचालक मंडळातील सदस्य राहुल सोलापूरकर व अनघा घैसास यांच्या मदतीने दोन दिवसांनंतर दाखल केलेला गुन्हा कोणाच्या पाठिंब्यामुळे आहे हे वेगळे सांगायला नको. मात्र पोलिसांनीही संस्थेत अमली पदार्थ आणले जातात, असे सांगून विद्यार्थ्यांची बाजू कमकुवत केली आहे. हे घडणारे सर्व प्रकार आंदोलन दडपण्यासाठी होत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यामागे कोण शक्ती कार्य करीत आहे, याचा शोध लागावा, यासाठी या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)