शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

...हा संस्था बंद पाडण्याचा डाव

By admin | Updated: July 25, 2015 04:14 IST

एफटीआयआयमधील ‘महाभारता’ला आता वेगळेच वळण लागले आहे. ज्या संस्थेपासून राजकीय शक्ती दूर ठेवण्याच्या बाता मारल्या जात होत्या,

पुणे : एफटीआयआयमधील ‘महाभारता’ला आता वेगळेच वळण लागले आहे. ज्या संस्थेपासून राजकीय शक्ती दूर ठेवण्याच्या बाता मारल्या जात होत्या, त्या संस्थेमध्येच आता विद्यार्थ्यांच्या विरोधातले राजकारण सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांवर दाखल झालेला गुन्हा, संस्थेमध्ये मुले अमली पदार्थ घेत असल्याने पोलिसांची त्यांच्यावर असलेली करडी नजर आणि यातच आता पतितपावन संघटनेने या मुलांना अटक करण्यासाठी काढलेला मोर्चा या गोष्टींमधून विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचे प्रकार आता सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन किती काळ तग धरणार हाच कळीचा मुद्दा आहे. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलनाचे ४२ दिवस सरले तरी केंद्र शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. मात्र हे आंदोलन संपवण्याचे प्रकार या ना त्या मार्गाने सुरू झाले आहेत. या साऱ्या गोष्टी संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या आहेत, असे सांगत हा विरोधी विचारांच्या व्यक्तींचा संस्था बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच विरोधक आंदोलनाला मूळ मुद्द्यांपासून हटवून वेगळे वळण लावत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, चांदेकर यांनी संचालक मंडळातील सदस्य राहुल सोलापूरकर व अनघा घैसास यांच्या मदतीने दोन दिवसांनंतर दाखल केलेला गुन्हा कोणाच्या पाठिंब्यामुळे आहे हे वेगळे सांगायला नको. मात्र पोलिसांनीही संस्थेत अमली पदार्थ आणले जातात, असे सांगून विद्यार्थ्यांची बाजू कमकुवत केली आहे. हे घडणारे सर्व प्रकार आंदोलन दडपण्यासाठी होत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यामागे कोण शक्ती कार्य करीत आहे, याचा शोध लागावा, यासाठी या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)