शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

वैकुंठ स्मशानभूमीची "निरी"च्या पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढल्याने वैकुंठ स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली होती. येथील ...

पुणे : शहरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढल्याने वैकुंठ स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली होती. येथील अंत्यविधी वाढल्याने धुराचे प्रमाणही वाढले होते. वैकुंठ स्मशानभूमीच्या प्रदूषणाबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आक्षेप घेत निरीकडून तपासणी करून घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाची धावपळ उडाली होती. यासंदर्भात पालिकेने निरीसोबत पत्रव्यवहार केला होता. मंगळवारी निरीच्या पथकाने स्मशानभूमीची पाहणी केली. आणखी तीन दिवस ही तपासणी सुरू राहणार आहे.

या पथकात निरीच्या पद्मा राव, शर्मा यांचा समावेश असून त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रताप जगताप हे देखील उपस्थित होते. वैकुंठ स्मशानभूमीतील प्रदूषणाबाबत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. विद्युत दाहिनीच्या चिमणीची रूंदी कमी असून धूरासोबत बाहेर पडणारी राख थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. तसेच स्थानिक नागरिक हरित न्यायाधिकरणात गेले आहेत.

त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली होती. धूर कमी करण्यासाठी निरीच्या माध्यमातून यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार निरीच्या पथकाने मंगळवारी पाहणी करून काही निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यांनी सुचविलेल्या निकषांनुसार बदल केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

----

वैकुंठ स्मशानभूमीमधील वृक्षराजी आणि हिरवळीबाबत निरीच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच यंत्रसामुग्री चांगली असल्याचे नमूद केले. मात्र, त्याच्या कार्यप्रणालीमध्ये दोष असल्याचे नमूद केले आहे. येथील विविध वायू (गॅस) आणि रसायनाची (केमिकल) तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम अहवाल दिला जाणार आहे. दरम्यान, स्मशानभूमीत लाकडावर होणारे अंत्यविधी कमी करण्याची प्राथमिक शिफारस निरीच्या सदस्यांनी केल्याचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले.