शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

डिजिटल गावांच्या निर्मितीसाठी पुढाकार

By admin | Updated: February 14, 2017 01:43 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ग्रामीम भागात डिजिटल

पुणे: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये ग्रामीम भागात डिजिटल गावा, डिजिटल शाळा, डिजिटल ग्रामपंचायत आणि डिजिटल आरोग्य केंद्रांच्या निर्मितीवर अधिक भर देण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक गावांमध्ये सिमेंटचे रस्ते, पिण्याचे शुध्द पाणी, प्रत्येक गावांत व्यायाम शाळा अन् ज्येष्ठ नागरिकांसाठी वेरंगुळा केंद्र करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा जाहीरनाम्यात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँगे्रसचा हा जाहीरनामा मागील निवडणुकीत दिलेली आश्वासने व केलेली कर्तव्यपूर्ती यावर अधिक भर देण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक विभागनिहया दिलेली आश्वासने व केलेली कामे यांचा सविस्तर आढावा घेण्यात आले आहे. यामध्ये गेल्या पाच वर्षांत तब्बल ३ हजार ८५ कोटी रुपयांची कामे केली असल्याचे म्हटले आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एका मोठ्या गावांमध्ये शाहू-फुले आंबेडकर ग्राम अभ्यासिका उभारण्यात येणार असून, संबंधित गाव परिसरातील विद्यार्थ्यांना युपीएसी, एमपीएसी अभ्यासक्रमासाठी याचा मोठ्या उपयोग होणार असल्याचे कंद यांनी सांगितले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ई-लर्निंग सुरु करणार, शंभर टक्के अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती देणार, मोठ्या गावांमध्ये शुध्द पाण्यासाठी आर.ओ यंत्र बसविणार, ग्रामीण भागात कच-यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, मोठ्या गावांसाठी कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रकल्प उभरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शंभर टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांना सौर ऊर्जा प्रकल्प सबविण्यात येणार, सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र योजना राबविणार, शंभर टक्के शौचालय असलेल्या गावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार यासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे.दरम्यान जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसने आपल्या जाहीरनाम्यात हजारो आश्वासने दिली असली तरी यातील बहुतेक आश्वासने ही सध्या सुरु असलेल्या सरकारी योजनाच आहेत. जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामे, तुकडा बंदी कायदा, रस्त्यांची दुरुवस्था किंवा कोणतही नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचे आश्वासन देण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)