शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

भिलारेवाडीत रस्त्यांवर तसेच बेकायदा बांधकामांचे पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:10 IST

.................................... अतिक्रमण निर्मूलनाचे आव्हान ..................................,,..... दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भिलारेवाडीत रस्ते चांगले आहेत, मात्र त्यांच्यावर अतिक्रमण ...

....................................

अतिक्रमण निर्मूलनाचे आव्हान

..................................,,.....

दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भिलारेवाडीत रस्ते चांगले आहेत, मात्र त्यांच्यावर अतिक्रमण झाले आहे. इतकेच नव्हे तर नियम न पाळता बांधकामे होत असल्याने भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीती गावकऱ्यांना वाटत आहे.

गावातील अंतर्गत रस्ते उत्तम असून विविध गल्लीबोळांतही कॉंक्रिटचे रस्ते झालेले आहेत. त्यामुळे रस्त्यांचा विषय गावासाठी महत्त्वाचा नसला तरी वाढते अतिक्रमण हा चिंतेचा विषय असल्याचे गावकरी सांगतात. आता महापालिकेत गाव जात असताना अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांना वेग आला असून ठिकठिकाणी रस्त्यांवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे या भागात कात्रज, धनकवडीची पुनरावृत्ती होऊ शकते.

नागरीकरण वाढत असताना अनेक ठिकाणी इमारती एकमेकांना खेटून बांधल्या गेल्या आहेत, त्यामुळे भविष्यात अग्निशमन दलाच्या गाड्या किंवा रुग्णवाहिका आत जाणार कशा, असा सवाल गावातील नागरिकांनी विचारताच तसेच महापालिकेने शिस्त लावावी अशी अपेक्षा व्यक्त करतात.

गावात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने जेष्ठ नागरिकांची आबाळ होत आहे, त्याचबरोबर सोय म्हणून विरंगुळा केंद्र नाही, तसेच व्यायामशाळेची सुविधा नसल्याने तरुणांनी नाराजी व्यक्त केली.

कोरोनाकाळात गावात योग्य वेळी योग्य पद्धतीने उपाययोजना केल्या गेल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता आला होता. पण आता कोरोनाचा ज्वर पुन्हा वाढत असल्याने आता महापालिका आणि ग्रामपंचायत कशी पावलं उचलणार याविषयी गावकऱ्यांमध्ये साशंकता आहे.

टाळेबंदीत, गावातील छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यासंदर्भात काही मदत किंवा विशेष योजनेद्वारे त्याची भरपाई न झाल्यामुळे गावातील छोट्या व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.

__________________________________

गावात आलेल्या महापुरात काही ठिकाणी ड्रेनेजची पाईप वाहून गेले होते, तर काही ठिकाणी ते जोडलेले नसल्याने दुर्गंधी येते. महापालिकेने ड्रेनेजबरोबर सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधावीत.

- सोपान दगडू भिलारे,

जेष्ठ नागरिक

_________________________

गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी महापालिकेने प्राधान्य द्यावे.

- अनिल कदम, नोकरदार.

......................................

फोटो ओळ:

गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या ओढ्यातच नवीन बांधकामांचा राडारोडा, कचरा टाकला जातो. त्यामुळे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा येतो तसेच अनारोग्याचे वातावरण निर्माण होते.