शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

प्रदूषणामुळे इंद्रायणीचे पावित्र्य हरपले

By admin | Updated: April 28, 2017 05:41 IST

भारतीय संस्कृतीत मातेसमान मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरल्याने

शेलपिंपळगाव : भारतीय संस्कृतीत मातेसमान मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरल्याने इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात येऊ लागले आहे. मागील काही महिन्यांपासून नदीच्या प्रदूषणात कमालीची वाढ होत आहे. आळंदीतील स्थानिक नागरिकांसह भाविकांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. महिन्यापूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नदीच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच नदी स्वच्छ करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अद्यापही प्रशासनाकडून त्यासंदर्भात कुठलीही ठोस पावले उचलली नाहीत. इंद्रायणीला पूर्वीचे निर्मळ वैभव कधी प्राप्त होणार? असा सवाल भाविकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.सध्या आळंदीतील पवित्र इंद्रायणी पात्रात पाण्याचा अतिशय अल्प साठा आहे. त्यामुळे नदीचे पात्र काही ठिकाणी कोरडे ठणठणीत पडले आहे. परंतु पात्रात शिल्लक असलेल्या पाण्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पश्चिमेकडील औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित घाण पाणी इंद्रायणीच्या प्रवाह पात्रात सोडले जात असल्याने पाण्याचा निळा रंग बदलून पाण्याला काळा कुळकुळीत रंग आलेला आहे. त्यातच इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात कचराही टाकला जात असून, बिनधास्तपणे सांडपाणी सोडले जात असल्याने नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. परिणामी पाण्याचा दुर्गंधीयुक्त घाण वास येऊ लागला आहे. आळंदी हे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे समाधिस्थळ असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत माउलींच्या दर्शनासाठी येत असते. परंतु वाहतूककोंडी, खड्डेमय रस्ते, घनकचरा, दुर्गंधी अतिक्रमण आदी विविध समस्यांमुळे ‘देवाच्या दारी समस्या भारी’ असाच प्रत्यय सध्या भाविकांना अनुभवयास मिळत आहे. अस्ताव्यस्त पडलेला केरकचरा, काचा, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खरकटे अन्न आदी गोष्टींमुळे नदी प्रदूषित झाली आहे.