शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

प्रदूषणामुळे इंद्रायणीचे पावित्र्य हरपले

By admin | Updated: April 28, 2017 05:41 IST

भारतीय संस्कृतीत मातेसमान मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरल्याने

शेलपिंपळगाव : भारतीय संस्कृतीत मातेसमान मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरल्याने इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात येऊ लागले आहे. मागील काही महिन्यांपासून नदीच्या प्रदूषणात कमालीची वाढ होत आहे. आळंदीतील स्थानिक नागरिकांसह भाविकांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. महिन्यापूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नदीच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच नदी स्वच्छ करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अद्यापही प्रशासनाकडून त्यासंदर्भात कुठलीही ठोस पावले उचलली नाहीत. इंद्रायणीला पूर्वीचे निर्मळ वैभव कधी प्राप्त होणार? असा सवाल भाविकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.सध्या आळंदीतील पवित्र इंद्रायणी पात्रात पाण्याचा अतिशय अल्प साठा आहे. त्यामुळे नदीचे पात्र काही ठिकाणी कोरडे ठणठणीत पडले आहे. परंतु पात्रात शिल्लक असलेल्या पाण्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पश्चिमेकडील औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित घाण पाणी इंद्रायणीच्या प्रवाह पात्रात सोडले जात असल्याने पाण्याचा निळा रंग बदलून पाण्याला काळा कुळकुळीत रंग आलेला आहे. त्यातच इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात कचराही टाकला जात असून, बिनधास्तपणे सांडपाणी सोडले जात असल्याने नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. परिणामी पाण्याचा दुर्गंधीयुक्त घाण वास येऊ लागला आहे. आळंदी हे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे समाधिस्थळ असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत माउलींच्या दर्शनासाठी येत असते. परंतु वाहतूककोंडी, खड्डेमय रस्ते, घनकचरा, दुर्गंधी अतिक्रमण आदी विविध समस्यांमुळे ‘देवाच्या दारी समस्या भारी’ असाच प्रत्यय सध्या भाविकांना अनुभवयास मिळत आहे. अस्ताव्यस्त पडलेला केरकचरा, काचा, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खरकटे अन्न आदी गोष्टींमुळे नदी प्रदूषित झाली आहे.