शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलासाठी भारत जबाबदार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:08 IST

पुणे : मागील दीडशे वर्षांत कार्बन उत्सर्जनात भारताचा वाटा केवळ तीन टक्के असून हवामान बदलासाठी (क्लायमेट चेंज) भारत देश ...

पुणे : मागील दीडशे वर्षांत कार्बन उत्सर्जनात भारताचा वाटा केवळ तीन टक्के असून हवामान बदलासाठी (क्लायमेट चेंज) भारत देश जबाबदार नाही. मात्र, पर्यावरण संवर्धनात भारताचा सहभाग गरजेचा आहे, असे मत केंद्रीय वन, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पर्यावरण ‘ई-शिक्षण केंद्रा’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रकाश जावडेकर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य केले. यावेळी डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, डॉ. प्रफुल्ल पवार, वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी, पर्यावरण शिक्षण केंद्राचे प्रमुख विवेक नाबर, डॉ. बाळकृष्ण दामले, माजी नगरसेवक विकास दांगट, भवताल मासिकाचे संपादक अभिजित घोरपडे उपस्थित होते. यावेळी ‘तळजाई - ग्रीन हार्ट ऑफ द सिटी’ हा माहितीपटही दाखवण्यात आला.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, पुण्यातील टेकड्यांच्या सद्य:स्थितीचे माहिती संकलन केल्याने यात पुढील काळात काय बदल झाले याचा अभ्यास करण्यासाठी ‘बेसलाईन डेटा’ तयार होईल. अनेक संस्थांच्या मदतीने हे काम विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभाग करत आहे.

डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले की, पर्यावरण रक्षण हे शास्त्रीय पद्धतीने केल्यास एक चांगला डेटाबेस पुढच्या पिढीसाठी या ई-साहित्यातून निर्माण होईल. अभिजित घोरपडे म्हणाले, ‘झाडे लावा व प्लास्टिक टाळा’ या पलीकडे जाऊन पर्यावरण संवर्धनाचे काम करण्याची सध्या गरज आहे.

----------

पर्यावरण संवर्धन म्हणजे केवळ झाडे लावणे नसून ‘नैसर्गिक अधिवास’ ही संकल्पना जाणून घेऊन अभ्यासपूर्ण संवर्धनाचे काम करणे गरजेचे आहे. या ई-साहित्याच्या माध्यमातून दर्जेदार पर्यावरण साहित्य व उपयुक्त डेटाबेस निर्माण करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

------