शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

हवामान बदलासाठी भारत जबाबदार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:08 IST

पुणे : मागील दीडशे वर्षांत कार्बन उत्सर्जनात भारताचा वाटा केवळ तीन टक्के असून हवामान बदलासाठी (क्लायमेट चेंज) भारत देश ...

पुणे : मागील दीडशे वर्षांत कार्बन उत्सर्जनात भारताचा वाटा केवळ तीन टक्के असून हवामान बदलासाठी (क्लायमेट चेंज) भारत देश जबाबदार नाही. मात्र, पर्यावरण संवर्धनात भारताचा सहभाग गरजेचा आहे, असे मत केंद्रीय वन, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पर्यावरण ‘ई-शिक्षण केंद्रा’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रकाश जावडेकर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य केले. यावेळी डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, डॉ. प्रफुल्ल पवार, वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी, पर्यावरण शिक्षण केंद्राचे प्रमुख विवेक नाबर, डॉ. बाळकृष्ण दामले, माजी नगरसेवक विकास दांगट, भवताल मासिकाचे संपादक अभिजित घोरपडे उपस्थित होते. यावेळी ‘तळजाई - ग्रीन हार्ट ऑफ द सिटी’ हा माहितीपटही दाखवण्यात आला.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, पुण्यातील टेकड्यांच्या सद्य:स्थितीचे माहिती संकलन केल्याने यात पुढील काळात काय बदल झाले याचा अभ्यास करण्यासाठी ‘बेसलाईन डेटा’ तयार होईल. अनेक संस्थांच्या मदतीने हे काम विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभाग करत आहे.

डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले की, पर्यावरण रक्षण हे शास्त्रीय पद्धतीने केल्यास एक चांगला डेटाबेस पुढच्या पिढीसाठी या ई-साहित्यातून निर्माण होईल. अभिजित घोरपडे म्हणाले, ‘झाडे लावा व प्लास्टिक टाळा’ या पलीकडे जाऊन पर्यावरण संवर्धनाचे काम करण्याची सध्या गरज आहे.

----------

पर्यावरण संवर्धन म्हणजे केवळ झाडे लावणे नसून ‘नैसर्गिक अधिवास’ ही संकल्पना जाणून घेऊन अभ्यासपूर्ण संवर्धनाचे काम करणे गरजेचे आहे. या ई-साहित्याच्या माध्यमातून दर्जेदार पर्यावरण साहित्य व उपयुक्त डेटाबेस निर्माण करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

------