शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

हवामान बदलासाठी भारत जबाबदार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:08 IST

पुणे : मागील दीडशे वर्षांत कार्बन उत्सर्जनात भारताचा वाटा केवळ तीन टक्के असून हवामान बदलासाठी (क्लायमेट चेंज) भारत देश ...

पुणे : मागील दीडशे वर्षांत कार्बन उत्सर्जनात भारताचा वाटा केवळ तीन टक्के असून हवामान बदलासाठी (क्लायमेट चेंज) भारत देश जबाबदार नाही. मात्र, पर्यावरण संवर्धनात भारताचा सहभाग गरजेचा आहे, असे मत केंद्रीय वन, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पर्यावरण ‘ई-शिक्षण केंद्रा’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रकाश जावडेकर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य केले. यावेळी डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, डॉ. प्रफुल्ल पवार, वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी, पर्यावरण शिक्षण केंद्राचे प्रमुख विवेक नाबर, डॉ. बाळकृष्ण दामले, माजी नगरसेवक विकास दांगट, भवताल मासिकाचे संपादक अभिजित घोरपडे उपस्थित होते. यावेळी ‘तळजाई - ग्रीन हार्ट ऑफ द सिटी’ हा माहितीपटही दाखवण्यात आला.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, पुण्यातील टेकड्यांच्या सद्य:स्थितीचे माहिती संकलन केल्याने यात पुढील काळात काय बदल झाले याचा अभ्यास करण्यासाठी ‘बेसलाईन डेटा’ तयार होईल. अनेक संस्थांच्या मदतीने हे काम विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभाग करत आहे.

डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले की, पर्यावरण रक्षण हे शास्त्रीय पद्धतीने केल्यास एक चांगला डेटाबेस पुढच्या पिढीसाठी या ई-साहित्यातून निर्माण होईल. अभिजित घोरपडे म्हणाले, ‘झाडे लावा व प्लास्टिक टाळा’ या पलीकडे जाऊन पर्यावरण संवर्धनाचे काम करण्याची सध्या गरज आहे.

----------

पर्यावरण संवर्धन म्हणजे केवळ झाडे लावणे नसून ‘नैसर्गिक अधिवास’ ही संकल्पना जाणून घेऊन अभ्यासपूर्ण संवर्धनाचे काम करणे गरजेचे आहे. या ई-साहित्याच्या माध्यमातून दर्जेदार पर्यावरण साहित्य व उपयुक्त डेटाबेस निर्माण करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

------