शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

हद्दीलगतच्या गावांसाठी स्वतंत्र धोरण

By admin | Updated: May 9, 2015 03:33 IST

महापालिकेच्या हद्दीपासून पुढे पाच किलोमीटरच्या अंतरावरील २१ गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे.

पुणे : महापालिकेच्या हद्दीपासून पुढे पाच किलोमीटरच्या अंतरावरील २१ गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे. महापालिकेकडून यातील काही गावांमध्ये शुद्ध केलेले पाणी, तर काही गावांमध्ये रॉ वॉटर (शुद्ध न केलेले पाणी) पुरविले जाते. मात्र, त्यासाठी दर समान स्वरूपात आकारला जातो. त्यामुळे काही ग्रामपंचायतींनी गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेस या पाण्यासाठीचे बिल देण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेने मागील आठवडयात काही ग्रामपंचायतींचे पाणी तोडले होते. यावरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी हे धोरण ठरविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.राज्यशासनाच्या आदेशानुसार, पालिका हद्दीजवळच्या २१ गावांची गेल्या काही वर्षांची तब्बल ४५ कोटींची पाणी बिले थकलेली आहे. त्यातील नऱ्हे, किरकटवाडी, खडकवासला, नांदेड आणि नांदोशी या ग्रामपंचायतींची ११ कोटी ३४ लाखांची थकबाकी आहे. या ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा महापालिकेने शनिवारी (दि. २) तोडला होता. मात्र, स्थानिक आमदार तसेच राज्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, या प्रकारानंतर पालिकेने आकारलेली बिले योग्य दराने नसल्याचा आरोप ग्रामपंचायतींनी केला असून, त्यासाठी पालिकेने स्वतंत्र धोरण करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, हे धोरण ठरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.