शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर-माळशिरसच्या शेतकऱ्यांचे पाण्यासाठी आंदोलन

By admin | Updated: March 9, 2017 04:11 IST

इंदापूर व माळशिरस टा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी इंदापूर-अकलूज रस्त्यावरील सराटी येथे बुधवारी (दि. ८) रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दोन्ही तालुक्यांतील

बावडा : इंदापूर व माळशिरस टा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी इंदापूर-अकलूज रस्त्यावरील सराटी येथे बुधवारी (दि. ८) रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दोन्ही तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तातडीने नदीत पाणी सोडण्याचा निर्णय न झाल्यास कोरड्या नदीपात्रात उपोषण करण्याचा इशाराही या वेळी शेतकऱ्यांनी दिला. नीरा नदीवरील बंधाऱ्यांचे ढापे टाकण्याचे व्यवस्थापन १५ आॅक्टोबर १६ रोजी सुरू करण्यात आले. त्यामुळे नदीतील पाणी बंद झाले. परिणामी नीरा नदीवरील सर्व बंधारे पूर्णक्षमतेने भरले गेले नव्हते. याच गोष्टींचा विचार करून, पुणे पाटबंधारे अंतर्गत येणारे सर्व बंधारे पूर्णपणे भरून दिले. परंतु, नीरा उजवा कालवा फलटण यांच्या अंतर्गत येणारे इंदापूर व माळशिरस तालुक्यातील बोराटवाडी चाकाटी, आनंदनगर, अकलूज, सराटी, लुमेवाडी, गोंदी व ओझरे हे बंधारे कोरडेठाक राहिले. अनेकदा अर्ज, विनंत्या करूनही फलटण येथील संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे या परिसरात नदीकाठी येणारी माळशिरस तालुक्यातील बांगारडे, तिरवंडी, चाकोरे, कोंडबावी, आनंदनगर, अकलूज, माळीनगर, गणेशगाव, तांबवे, बिजवडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी, चाकाटी, पिठेवाडी, नीर-निमगाव, कचरवाडी, सराटी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, गिरवी आदी आदी गावांमधील शेती पाण्याअभावी धोक्यात आली. या संपूर्ण परिसरात नीरा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा तसेच चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, बावडा मंडल अधिकारी एस. टी. लोखंडे यांनी या शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. या वेळी तहसीलदार पाटील यांनी आपली मागणी शासनापर्यंत निश्चितपणे पोहोचवून लवकरच याविषयी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत एक बैठक घेऊन पाठपुरावा करू, असे सांगितले. या निवेदनावर अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती प्रदीप जगदाळे, दत्तात्रय घोगरे, हनुमंत कोकाटे, नवनाथ रुपनवर, समाधान बोडके आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या वेळी इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. (वार्ताहर)त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांचे ऊस जे कारखाने नेतात त्या संबंधित कारखान्यांनीदेखील या बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासंबंधी लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी; अन्यथा भविष्यात इथला शेतकरी उसाचे एक टिपरू देखील या कारखान्यांना देणार नाही. - अप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती