शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

इंदापूर-माळशिरसच्या शेतकऱ्यांचे पाण्यासाठी आंदोलन

By admin | Updated: March 9, 2017 04:11 IST

इंदापूर व माळशिरस टा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी इंदापूर-अकलूज रस्त्यावरील सराटी येथे बुधवारी (दि. ८) रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दोन्ही तालुक्यांतील

बावडा : इंदापूर व माळशिरस टा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी इंदापूर-अकलूज रस्त्यावरील सराटी येथे बुधवारी (दि. ८) रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दोन्ही तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तातडीने नदीत पाणी सोडण्याचा निर्णय न झाल्यास कोरड्या नदीपात्रात उपोषण करण्याचा इशाराही या वेळी शेतकऱ्यांनी दिला. नीरा नदीवरील बंधाऱ्यांचे ढापे टाकण्याचे व्यवस्थापन १५ आॅक्टोबर १६ रोजी सुरू करण्यात आले. त्यामुळे नदीतील पाणी बंद झाले. परिणामी नीरा नदीवरील सर्व बंधारे पूर्णक्षमतेने भरले गेले नव्हते. याच गोष्टींचा विचार करून, पुणे पाटबंधारे अंतर्गत येणारे सर्व बंधारे पूर्णपणे भरून दिले. परंतु, नीरा उजवा कालवा फलटण यांच्या अंतर्गत येणारे इंदापूर व माळशिरस तालुक्यातील बोराटवाडी चाकाटी, आनंदनगर, अकलूज, सराटी, लुमेवाडी, गोंदी व ओझरे हे बंधारे कोरडेठाक राहिले. अनेकदा अर्ज, विनंत्या करूनही फलटण येथील संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे या परिसरात नदीकाठी येणारी माळशिरस तालुक्यातील बांगारडे, तिरवंडी, चाकोरे, कोंडबावी, आनंदनगर, अकलूज, माळीनगर, गणेशगाव, तांबवे, बिजवडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी, चाकाटी, पिठेवाडी, नीर-निमगाव, कचरवाडी, सराटी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, गिरवी आदी आदी गावांमधील शेती पाण्याअभावी धोक्यात आली. या संपूर्ण परिसरात नीरा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा तसेच चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, बावडा मंडल अधिकारी एस. टी. लोखंडे यांनी या शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. या वेळी तहसीलदार पाटील यांनी आपली मागणी शासनापर्यंत निश्चितपणे पोहोचवून लवकरच याविषयी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत एक बैठक घेऊन पाठपुरावा करू, असे सांगितले. या निवेदनावर अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती प्रदीप जगदाळे, दत्तात्रय घोगरे, हनुमंत कोकाटे, नवनाथ रुपनवर, समाधान बोडके आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या वेळी इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. (वार्ताहर)त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांचे ऊस जे कारखाने नेतात त्या संबंधित कारखान्यांनीदेखील या बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासंबंधी लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी; अन्यथा भविष्यात इथला शेतकरी उसाचे एक टिपरू देखील या कारखान्यांना देणार नाही. - अप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती