शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

दुष्काळी भागात पाण्याची दाहकता वाढली

By admin | Updated: September 30, 2015 01:16 IST

पाण्याची भीषण टंचाई... जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न... वाढत चाललेला बेरोजगार हा दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील लोकांच्या पाचवीलाच पुजलेला.

खोर : पाण्याची भीषण टंचाई... जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न... वाढत चाललेला बेरोजगार हा दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील लोकांच्या पाचवीलाच पुजलेला. या भागाच्या पाण्याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केलेले असून आगामी महिन्यात वरुणराजाने जर पाठ फिरवली तर पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन टंचाईच्या भीषणतेची मोठी झळ भासणार असल्याचे या भागामधील एकंदरीत चित्र आहे. मोठ्या आशा पल्लवीत करीत या भागातील शेतकरीवर्गाने खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, ऐन सुगीचा हंगाम केवळ पावसाच्या लांबणीने वाया गेला. या भागामधील जवळपास ३० टक्केच खरिपाचा हंगाम चांगल्या प्रकारे डौलारा धरू शकला. ७० टक्के खरीप हंगामाच्या पेरण्या या केवळ पाण्याअभावी वाया गेल्या. या भागाच्या पाणीप्रश्नावर आमदार राहुल कुल हे सातत्याने विधानसभेत पाठपुरावा करीत आहेत. पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी पाझर तलाव व जनाई-शिरसाई योजनेतून पद्मावती तलाव भरून द्यावा, अशी खोर भागामधील शेतकऱ्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यातून जनाई योजनेतून पद्मावती तलावात पाणी सोडण्यात आले होते. मात्र वर्षातून किमान दोन तरी आवर्तने पुरंदर योजनेतून व जनाई योजनेतून सोडण्याची सरपंच रामचंद्र चौधरी यांची व ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)