शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

कटऑफ वाढल्याने विद्यार्थ्यांना विनाअनुदानित तुकडीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:15 IST

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यकक्षेतील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. येत्या १६ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने ...

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यकक्षेतील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. येत्या १६ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, या प्रवेश प्रक्रियेस सुमारे दोन ते तीन महिने लागणार आहेत. कोरोनाकाळात विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीनेच शिक्षण घेत आहेत. त्यामुळे यंदा कनिष्ठ महाविद्यालयांनाच प्रवेश देण्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी काही प्राचार्यांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रवेश लवकर झाले तर विद्यार्थ्यांचे वर्गही लवकर सुरू होतील. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत वेळ घालू नये, अशी अपेक्षा संस्थाचालक व प्राचार्यांकडून व्यक्त केली जात असली तरी प्रवेश प्रकियेत पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्यामुळे ऑनलाईन पध्दतीनेच प्रवेश द्यावेत, अशी काही विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. परंतु,अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत. एकूण परिस्थितीवरून कटऑफ वाढणार असल्याने ७० ते ७५ टक्के गुण मिळूनही या विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

--------------------------

गेल्या वर्षी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयामधील सुमारे ३५ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. मात्र, त्यातील बहुतांश सर्व जागा या विनाअनुदानित तुकड्यांच्या होत्या. विनाअनुदानित तुकडीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जास्त शुल्क द्यावे लागले. परिणामी अनुदानित तुकडीतील प्रवेशासाठी सर्वच प्रयत्न करतात. परंतु, बहुतांश सर्वच अनुदानित तुकड्यांसाठीचा कटऑफ ८० ते ९० टक्क्यांच्या पुढे असतो. त्यामुळे कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक शुल्क मोजावे लागणार आहे.

---------------------

गेल्या काही वर्षांपासून पुणे व पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविली जाणारी यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहेत. मात्र, निकाल वाढल्याने कट ऑफ वाढणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा विचार करून प्रवेश अर्जात पसंतीक्रम भरावे लागणार आहे.

- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड

-------------------------------------

ग्रामीण भागात दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तत्काळ अकरावी प्रवेश सुरू होता. त्यानंतर आठवड्याभरात अकरावीचे वर्ग सुरू होतात. ऑनलाईन प्रक्रियेत दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे उशिरा वर्ग सुरू होतात. विद्यार्थी शैक्षणिक हिताचा विचार करून महाविद्यालयांना ऑफलाईन पध्दतीने प्रवेश देण्याचे अधिकार देणे उचित होईल.

-अशोक मुंढे, उपप्राचार्य, वाडिया,कॉलेज

--------

नववीत कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. सीईटी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवता आले असते. त्याआधारे त्यांना आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता आला असता. मात्र, सीईटी रद्द झाल्याने आम्ही विद्यार्थी चिंतेत आहोत.

- ऐश्वर्या विश्वकर्मा, विद्यार्थी