शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या फेऱ्यांमध्ये वाढ

By admin | Updated: November 14, 2015 03:11 IST

शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीकपात लागू केल्यानंतर टँकरच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे

पुणे : शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीकपात लागू केल्यानंतर टँकरच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत टँकरच्या फेऱ्यांमध्ये ८ हजार १२६ फेऱ्यांनी वाढ झाली आहे. पाण्याचा कमी दाबाने अपुरा पुरवठा होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यांमध्ये निम्माच पाणीसाठी असल्याने यंदा शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने शहराच्या अनेक भागांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. विशेष अनेक मजली सोसायट्यांना पाणी कमी पडत असल्याने दररोज पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये १५ हजार ४५२ टँकरची मागणी नोंदविली गेली आहे, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये १२ हजार टँकरची आवश्यकता भासली होती. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात ११ हजार ५५० टँकरने पाणीपुरवठा झाला होता. यंदा आॅक्टोबर महिन्यात टँकरच्या १६ हजार २३३ फेऱ्या कराव्या लागल्या आहेत. पाणीकपात लागू होण्यापूर्वी केवळ आॅगस्ट १४ हजार टँकरची मागणी नोंदविली गेली होती. मागील वर्षीची तुलनेत पाणी कपातीनंतर टँकरच्या फेऱ्यांमध्ये ८ हजारांनी वाढ झाली झाली आहे. नागरिकांकडून टँकरची मागणी आल्यास महापालिकेकडून सवलतीच्या दरात टँकर पुरविले जातात. पाण्याचा अपुरा पुरवठा होणारा उपनगरांचा भाग, बाणेर, पाषाणमधील सोसायट्या यांच्याकडून टँकरची मागणी नोंदविली जात आहे. गैरवापर होऊ नये, म्हणून टँकरला जीपीएस बसविण्यात आली आहे. मात्र जीपीएस सिस्टिमचा वापर प्रभावीपणे सुरू नसल्याचे दिसून येते. त्यामुळे टँकरच्या पाण्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार अद्याप सुरूच आहेत.