शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
2
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
3
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
4
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
6
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
7
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
8
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
9
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
12
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
13
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
14
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
15
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
16
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
17
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
18
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
19
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
20
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

टँकरच्या फेऱ्यांमध्ये वाढ

By admin | Updated: November 14, 2015 03:11 IST

शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीकपात लागू केल्यानंतर टँकरच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे

पुणे : शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीकपात लागू केल्यानंतर टँकरच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत टँकरच्या फेऱ्यांमध्ये ८ हजार १२६ फेऱ्यांनी वाढ झाली आहे. पाण्याचा कमी दाबाने अपुरा पुरवठा होत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यांमध्ये निम्माच पाणीसाठी असल्याने यंदा शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने शहराच्या अनेक भागांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. विशेष अनेक मजली सोसायट्यांना पाणी कमी पडत असल्याने दररोज पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये १५ हजार ४५२ टँकरची मागणी नोंदविली गेली आहे, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये १२ हजार टँकरची आवश्यकता भासली होती. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात ११ हजार ५५० टँकरने पाणीपुरवठा झाला होता. यंदा आॅक्टोबर महिन्यात टँकरच्या १६ हजार २३३ फेऱ्या कराव्या लागल्या आहेत. पाणीकपात लागू होण्यापूर्वी केवळ आॅगस्ट १४ हजार टँकरची मागणी नोंदविली गेली होती. मागील वर्षीची तुलनेत पाणी कपातीनंतर टँकरच्या फेऱ्यांमध्ये ८ हजारांनी वाढ झाली झाली आहे. नागरिकांकडून टँकरची मागणी आल्यास महापालिकेकडून सवलतीच्या दरात टँकर पुरविले जातात. पाण्याचा अपुरा पुरवठा होणारा उपनगरांचा भाग, बाणेर, पाषाणमधील सोसायट्या यांच्याकडून टँकरची मागणी नोंदविली जात आहे. गैरवापर होऊ नये, म्हणून टँकरला जीपीएस बसविण्यात आली आहे. मात्र जीपीएस सिस्टिमचा वापर प्रभावीपणे सुरू नसल्याचे दिसून येते. त्यामुळे टँकरच्या पाण्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार अद्याप सुरूच आहेत.