शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

महापालिका निवडणुका पुढे ढकलणे अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “निवडणूक आयोगाने कोरोना साथीचे सर्व नियम पाळून निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे. महापालिका निवडणूक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “निवडणूक आयोगाने कोरोना साथीचे सर्व नियम पाळून निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे. महापालिका निवडणूक फेब्रुवारी-२०२२ मध्ये होणार आहे. राज्यातल्या सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. आता निवडणूक एक-दोन वर्षे पुढे ढकलणे योग्य वाटत नाही,” असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

मंगळवारी (दि. ८) पुण्यात एका कार्यक्रमात पवार बोलत होते. इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारकडून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा दबाव निर्माण केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी भूमिका स्पष्ट केली.

कोरोनाकाळात सर्व व्यवहार आणि दुकाने सुरू झाली आहेत. पण आता राजकीय पक्षांकडूनही मंदिरे उघडण्याबाबतही आंदोलने होत आहेत. शाळा उघडण्याबाबही विचार सुरू आहे. पण काहीही उघडायचे असल्यास सरकारची आणि आरोग्य विभागाची परवानगी घ्यावी लागते. ज्या ठिकाणी नागरिक नियमांची काळजी घेतील तिथेच परवानगी दिली जाईल, असे पवार म्हणाले. रिझर्व्ह बँकेचे नागरी सहकारी बँकांबाबतचे धोरण पाहता देशातून नागरी सहकारी बँका बंद करण्याचा रिझर्व्ह बँकेचा इरादा दिसतो. विशिष्ट लोकांच्या हाती सूत्रे देऊन सहकारक्षेत्र संपविण्याचा घाट केंद्राकडून सुरू असल्याची टीका पवारांनी केली.

चौकट

ईडीवर संसदेत करणार चर्चा

“ज्या ठिकाणी गैरव्यवहार झाला असेल त्याचा तपास करण्यासाठी वेगवेगळे आयोग, राज्याचे गृहखाते आहे. तरीही ईडीने त्या संस्थांमध्ये जाऊन हस्तक्षेप करणे योग्य वाटत नाही. ही ईडी कोणाच्या मागे कशी लागेल हे सांगता येत नाही. ईडीच्या कारवायांमुळे राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे संसदेत या मुद्यावर चर्चा करणार आहे,” पवार यांनी स्पष्ट केले.

चौकट

मोहन भागवतांना टोला

“आपली मातृभूमी आणि गौरवशाली परंपरा हा देशातील एकतेचा आधार आहे. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत. हिंदू धर्माची ही व्याख्या ज्या कुठल्या पंथातील, धर्मातील, भाषेतील नागरिक मानतात, त्या सगळ्यांना आम्ही हिंदू मानतो,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वेसर्वा मोहन भागवत यांनी केले होते. त्यावर पवार म्हणाले, “मोहन भागवत हे सर्व धर्मांना एकच समजतात ही माझ्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदू-मुस्लिम त्यांना एक वाटतात हेच आमच्यासाठी खूप आहे. त्यामुळे माझ्या ज्ञानातही भर पडली.”