शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जेवणातील प्रथिनांचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:10 IST

प्रोटिन किंवा प्रथिनं आपल्या आरोग्यासाठी आवश्य पोषणमूल्य आहे. प्राणिजन्य पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींना, बऱ्याचदा पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात. कोणतेही ...

प्रोटिन किंवा प्रथिनं आपल्या आरोग्यासाठी आवश्य पोषणमूल्य आहे. प्राणिजन्य पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींना, बऱ्याचदा पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात. कोणतेही प्रोटिन (प्रथिनं)चांगल्या प्रतिचे होण्यासाठी त्यात ९ विशेष घटक (९ एसेंशयल अमिनो ॲसिड) असणे आवश्यक आहे. वनस्पतिजन्य पदार्थांत बऱ्याचदा या ९ पैकी एक किंवा अधिक घटक नसतात किंवा कमी प्रमाणात असतात आणि त्यामुळेच शाकाहारी किंवा वनस्पतिजन्य प्रथिने संपूर्ण प्रथिने समजली जात नाहीत.

पण मग शाकाहारी लोकांना संपूर्णपणे प्रथिने मिळतच नाहीत. तर असं अजिबात नाही. पहिली गोष्ट आपल्याकडे शाकाहारी व्यक्तीसुध्दा दूध, दही, पनीर असे प्राणिजन्य पदार्थ घेतात. हे पदार्थ योग्य प्रमाणात घेतले तर आवश्यक ती प्रथिने तसेच कॅल्शियमसारखी इतर पोषणमूल्ये देखील मिळतात. पण हल्ली अनेक लोक, आरोग्याच्या दृष्टीने किंवा इतर काही कारणांसाठी व्हेगन (प्राणिजन्य पदार्थांचा संपूर्ण अभाव) जीवनशैली आत्मसात करतात. असे लोक मुख्यत: प्रथिनांसाठी डाळी व कडधान्ये यावर अवलंबून असतात. परंतु, वर म्हणाल्याप्रमाणे, या पदार्थांत काही आवश्यक घटकांचा अभाव असल्याने त्यांना संपूर्ण प्रथिने मिळणे अवघड होऊ शकते.

अशा व्यक्तींनी, चांगल्या प्रतिची व पुरेशी प्रथिने मिळण्यासाठी, वेगवेगळ्या डाळी-कडधान्ये वापरावीत, रोज फक्त तुरीच्या डाळीचे वरण न घेता, कधी मूग, कधी मसूर तर कधी मिश्रडाळीचे वरण किंवा आमटी अवश्य घ्यावी. रोजच्या वरण आमटीमध्ये विविधता आणावी, जेणेकरून सर्व जण आवडीने खातील. जसे की मुगाच्या डाळीला, तूप, जिरे, लसूण अशी फोडणी छान वाटते. मसुराच्या आमटीची चव गरम मसाल्याने वाढते. थोडे आले खोबरे-आमसूल याने नेहमीचे वरणही आणखी चवदार होऊ शकते. पोळी/पराठे यासाठी कणिक भिजवताना, त्यात थोडे बेसन किंवा मुगाचे पीठ घालू शकतो.

हल्ली वजन कमी करण्यासाठी अथव मधुमेहामुळे अनेक लोकं भात टाळतात आणि त्यामुळे वरण, आमटी खाल्ले जात नाही. तसे होत असल्यास जाणीवपूर्वक वाटीत वरण-आमटी घेऊन खाणे गरजेचे आहे.

आपल्या परंपरेत असलेले धान्य व डाळी दोन्ही असणारे पदार्थ जसे थालिपीठ, मुगाच्या डाळीची खिचडी, मिश्र पिठाचे घावन तसेच दक्षिण भारतीय पदार्थ जसे डोसा, इडली असे पदार्थ आवश्य घ्यावे. धान्य आणि डाळी अथवा कडधान्य एकत्र आल्यास त्यातील प्रथिनांची प्रत उंचावण्यास मदत होते.