शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

कोरोनाकाळात आयुर्वेदाच्या माध्यमातून वाढवावी प्रतिकारशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:08 IST

गेल्या २३ वर्षांपासून डॉ. सत्यन गुजर हे सांध्यांचे आजार, पाठीच्या मणक्यांचे विकार, पोटाचे विकार, त्वचाविकार, स्त्री-पुरुष वंध्यत्व, किडनीविकार, हृदयविकार, ...

गेल्या २३ वर्षांपासून डॉ. सत्यन गुजर हे सांध्यांचे आजार, पाठीच्या मणक्यांचे विकार, पोटाचे विकार, त्वचाविकार, स्त्री-पुरुष वंध्यत्व, किडनीविकार, हृदयविकार, कॅन्सर यांवर चिकित्सा करतात. यामध्ये प्रामुख्याने सांध्यांचे आजार, पाठीच्या मणक्यांचे विकार, पोटाचे विकार, त्वचाविकार यावर ते उपचार करतात. आज कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. अनेक रुग्ण ॲलोपॅथी उपचार घेत असतात. काही केसमध्ये इतक्या गंभीर बनले असतात की, त्यांना काही महिन्यांचा अवधी दिला गेलेला असतो. अशा रुग्णांनाही शेवटी आयुर्वेदाच्या उपचारानेच नवे आयुष्य मिळाले असल्याचे सांगत डॉ. सत्यन गुजर म्हणाले की, ज्यांना १५ ते २० वर्षांपासून सांधेदुखीचे, पाठीच्या मणक्याचे आजार आहेत, अशा रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. पण, तरीही त्यांची या आजारातून सुटका होत नाही. अशा वेळी आपल्याकडील पंचकर्मसारखे उपचार करून घेऊन आज हे रुग्ण ठणठणीत आहेत. साधारण आतापर्यंत १ लाखाहून अधिक रुग्णांवर आपण उपचार केले असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्यासाठी कोरोना हे एक नवे संकट आहे. कोरोनाबाधित रुग्णांची अवस्था अत्यंत गंभीर असल्याचेही पाहायला मिळाले. या काळात ॲलोपॅथीमध्ये उपचार घेणार अनेक जण आयुर्वेदाकडे वळले. महत्त्वाचे म्हणजे कोरोनामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेकांनी विविध काढे, त्याचबरोबर काही गोळ्या घेतल्या. वास्तविक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे धोकादायक ठरू शकते. ॲलोपॅथीमध्ये उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी काही केल्या वाढत नसल्याच्या रुग्णांनीही आयुर्वेदिक उपचार घेतल्यानंतर बरे झाले आहे. कोरोनाकाळात केवळ आयुर्वेदिक उपचार घेऊन आतापर्यंत २०० रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सर्वांनी आतापासून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेणे आवश्यक आहे. म्हणजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही गोळ्या औषधे जर आतापासूनच घेतल्या तर त्यावेळी होणारा त्रास कमी होईल, असेही ते म्हणाले.