शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

कर्जमाफी देता येत नसेल, तर सत्ता सोडा : सुप्रिया सुळे

By admin | Updated: April 28, 2017 05:46 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नसेल, तर फडणवीस सरकारने राजीनामा देऊन सत्ता सोडावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले.

उरुळी कांचन : शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नसेल, तर फडणवीस सरकारने राजीनामा देऊन सत्ता सोडावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करावी व राज्य शासनाने तुरीची खरेदी तातडीने सुरू करावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी सुळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. २७) सकाळी पुणे-सोलापूर महामार्ग उरुळी कांचन येथे रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी भाजपा सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत निषेध नोंदविण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, संचालक सुरेश घुले, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, तालुकाध्यक्ष नंदू काळभोर, पंचायत समिती सभापती वैशाली महाडिक, उपसभापती अजिंक्य घुले, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, सुनंदा शेलार, कल्पना जगताप, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, कावेरी कुंजीर, युगंधर काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध विभागांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘आठवड्यामध्ये सरकारने कर्जमाफीवर निर्णय न घेतल्यास शेतकरीहितासाठीचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. सुरुवातीला पालकमंत्र्यांच्या गाड्यांना घेराव घालण्यात येईल. त्यानेही प्रश्न सुटला नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या गाडीला अडवून जाब विचारू, असे त्यांनी स्पष्ट केले. रमेश थोरात, सुरेश घुले, अशोक पवार, जालिंदर कामठे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनाचे संयोजन सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र चौधरी व तंटामुक्ती अध्यक्ष अमितबाबा कांचन यांनी केले होते.(वार्ताहर)