शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

कर्जमाफी देता येत नसेल, तर सत्ता सोडा : सुप्रिया सुळे

By admin | Updated: April 28, 2017 05:46 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नसेल, तर फडणवीस सरकारने राजीनामा देऊन सत्ता सोडावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले.

उरुळी कांचन : शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नसेल, तर फडणवीस सरकारने राजीनामा देऊन सत्ता सोडावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करावी व राज्य शासनाने तुरीची खरेदी तातडीने सुरू करावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी सुळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. २७) सकाळी पुणे-सोलापूर महामार्ग उरुळी कांचन येथे रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी भाजपा सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत निषेध नोंदविण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, संचालक सुरेश घुले, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, तालुकाध्यक्ष नंदू काळभोर, पंचायत समिती सभापती वैशाली महाडिक, उपसभापती अजिंक्य घुले, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, सुनंदा शेलार, कल्पना जगताप, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, कावेरी कुंजीर, युगंधर काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध विभागांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘आठवड्यामध्ये सरकारने कर्जमाफीवर निर्णय न घेतल्यास शेतकरीहितासाठीचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. सुरुवातीला पालकमंत्र्यांच्या गाड्यांना घेराव घालण्यात येईल. त्यानेही प्रश्न सुटला नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या गाडीला अडवून जाब विचारू, असे त्यांनी स्पष्ट केले. रमेश थोरात, सुरेश घुले, अशोक पवार, जालिंदर कामठे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनाचे संयोजन सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र चौधरी व तंटामुक्ती अध्यक्ष अमितबाबा कांचन यांनी केले होते.(वार्ताहर)