शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चुकले असतील तर संजय राठोडांवर कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत काही कमी-जास्त घडले असेल तर त्याची सखोल चौकशी व्हावी. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत काही कमी-जास्त घडले असेल तर त्याची सखोल चौकशी व्हावी. त्या चौकशीला कोणाचाही विरोध असता कामा नये. राठोड जर चुकले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी,’ अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली आहे.

शुक्रवारी (दि.२६) ते पत्रकार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते. शेट्टी म्हणाले की, हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. येथे स्त्रियांचा सन्मान झालाच पाहिजे. पूर्वीच्या सरकारच्या काळातील मंत्र्यांवर असेच आरोप झाले होते. आत्ता राजीनामा मागणाऱ्यांची तेव्हा काय भूमिका होती, याही प्रश्नाचे उत्तर द्यावे.

शेतकरी आंदोलन आणि अदानी-अंबानी या उद्योगपतींबद्दल बोलताना शेट्टी यांनी सांगितले, की तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. केंद्र सरकारला यावर मार्ग काढणे नामुष्कीजनक वाटत असावे. आतापर्यंत अडीचशे शेतकऱ्यांनी जीव गमावला आहे. सरकारने लादलेले तीन कृषी कायदे सामान्य माणसावरही परिणाम करणारे ठरणार आहेत. शेतकरी लुटला जाऊ नये, या भूमिकेतून बळीराजा आंदोलन करतोय. यात पुढे आलेले दोन नामधारक म्हणजेच अदानी-अंबानी होय. यापैकी अंबानीच्या घरासमोर स्फोटके सापडतात. म्हणजे नेमके हे घडवून आणले आहे का? त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी घडवलेले हे षडयंत्र असल्याचे माझे ठाम मत आहे. ही स्फोटके मुंबईत येत असताना गुप्तचर यंत्रणा, पोलीस, रॉ काय करत होती. मग आमची मुंबई सुरक्षित नाही का? सीबीआयने बाकी राजकीय कामांपेक्षा याकडे लक्ष द्यावे. अशी स्फोटके घराजवळ आणून अंबानींना सहानुभूती मिळेल असे त्यांनी अजिबात समजू नये, असे शेट्टी म्हणाले.