शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

रोज पाच-सहा हजार मिळाले असते तर रस्त्यावर कशाला बसले असते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डातील फळविक्रेत्यांना दररोज ५-६ हजार रुपये नफा मिळाला असता तर ते रस्त्यावर कशाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डातील फळविक्रेत्यांना दररोज ५-६ हजार रुपये नफा मिळाला असता तर ते रस्त्यावर कशाला बसले असते, असा सवाल करुन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांना प्रश्न केला आहे.

गरड यांनी रस्त्यावरील फळ विक्रेते दिवसाला ५-६ हजार रुपये नफा करत असल्याचे वक्तव्य केले होते. मार्केट यार्डातील फळ विक्रेत्यांना दररोज ४०० रुपये व जीएसटी भाडे आकारणी करण्याचा व रीतसर भाडे भरल्यानंतरच शिवाजी रस्त्यावर फळ विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. या संदर्भात डॉ. आढाव यांनी ‘लोकमत’कडे भूमिका स्पष्ट केली.

कृषी उत्पन्न समितीच्या जागेतील फळ विक्रेते जागेचे भाडे भरायला तयार आहे. पण, त्याचे भाडे आकारणी करताना त्याला काहीतरी निकष असावेत. मन, मानेल त्या प्रमाणे ही आकारणी करु नये, असे डॉ. आढाव म्हणाले. त्यांनी सांगितले की, पुणे शहरात महापालिका हॉकर्स कायद्याची अंमलबजावणी करीत आहे. त्यात झोननुसार २५ रुपयांपासून १०० रुपये भाडे आहे. त्यात पाणी व वीज पुरवठ्याचा समावेश आहे. मात्र, बाजार समितीने ४०० रुपये भाडे कोणत्या निकषावर ठरवले. या फळ विक्रेत्यांपासून १०० मीटर अंतरावर महापालिकेने पथारीवाल्यांचे पुनर्वसन केले आहे. त्यांना जास्तीत जास्त १०० रुपये भाडे आहे. बाजार समितीने हॉकर्स कायद्याची अंमलबजावणी करावी. नाही तर ते काम महापालिकेकडे सोपवावे, अशी आमची मागणी आहे.

कामगार युनियनचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे यांनी सांगितले की, फळ विक्रेत्यांच्या दैनंदिन उत्पन्नाबद्दलचे बाजार समितीचे प्रशासकांचे म्हणणे अतिशयोक्त आहे. इतका नफा ते कमावत असते तर त्यांनी मार्केट यार्डात गाळा घेतला असता. सचिव संतोष नांगरे म्हणाले की या ठिकाणच्या ३९ फळ विक्रेत्यांपैकी कोणीही फुटपाथवर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. त्यांची जागा फुटपाथपासून आत आहे.

चौकट

म्हणून मी आंदोलनात

“बाजार समिती सक्षम व्हावी, ती कायम राहावी, या समितीच्या बाजूनेच आमची भूमिका आहे. बाजार समितीच्या निर्णयाविरोधात पथारी व्यावसायिक पंचायतीने आंदोलन सुरु केले होते. परंतु, बाजार समितीसह कोणीही त्याची दखल न घेतल्याने आंदोलनात उतरण्याची वेळ माझ्यावर आली.” - डॉ. बाबा आढाव

चौकट

ताेलणारांची उपासमार

“बाजार समितीत तोलणार असावेत, अशी बाजार समितीची भूमिका आहे. शासनाने निबंधक सुनिल पवार यांचा अहवालही स्वीकारला आहे. हा प्रश्न सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, ‘मर्चंट चेंबर’ने तोलणार नको, अशी भूमिका घेतली आहे. तोलणार हे केवळ तोलाई करत नाहीत तर बाजारात माल किती आला, किती गेला, याची माहिती बाजार समितीला देत असतो”, असे ताेलणार संघटनेचे हणमंत बहिरट यांनी सांगितले.